शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

४0 डिग्रीतही झाले ६0 टक्के मतदान; जिल्ह्यातील मतदारांनी दाखवला उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:30 PM

लोकमत न्यूज नेटवर्क । सातारा: सातारा लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी मतदान पार पाडले. जिल्ह्यात पारा वाढला असतानादेखील मतदारांचा उत्साह ...

लोकमत न्यूज नेटवर्क । सातारा: सातारा लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी मतदान पार पाडले. जिल्ह्यात पारा वाढला असतानादेखील मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून मंगळवारी मतदान केले. ४0 अंश सेल्सिअसवर पारा गेला असताना सातारा मतदार संघात सरासरी ६0 टक्के मतदानाची नोंद झाली. मतदानाची अंतिम अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जारी केल्यावर या टक्केवारीत काहीअंशी बदल होण्याची शक्यता आहे.लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताऱ्यात राष्ट्रवादी काँगे्रसचे उदयनराजे भोसले व शिवसेनेचे नरेंद्र पाटील तर माढ्यामध्ये भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर व राष्ट्रवादी काँगे्रसचे संजय शिंदे यांच्यात मुख्य लढत असल्याचे चित्र होते.उमेदवारांच्या विजयासाठी पक्षांनी शक्ती पणाला लावल्याचे पाहायला मिळाले. निवडणुकीत पहिल्यांदाच ‘ईव्हीएम’सोबतच ‘व्हीव्हीपॅट’चा वापर करण्यात आला. काही ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड तर काही ठिकाणी ‘व्हीव्हीपॅट’च्या ‘स्लीप’ न दिसणे यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली होती. मतदार यादीतील घोळामुळे मतदारांची तारांबळ उडाली. काही मतदार मतदानापासून वंचित राहिले.या घटनांमुळे निवडणूक यंत्रणेचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले. मात्र, कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे दोन्ही मतदार संघात कुठलीही अनुचित घटना घडली नाही व शांततेत मतदान पार पडले.जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दुपारच्या सुमारास मात्र चढलेल्या पाºयाने मतदारांना घाम फोडला. ऊन कमी झाल्यानंतर मतदारांची पावले मतदान केंद्रांकडे वळली.साताºयात २०१४ च्या तुलनेत सुमारे जवळपास ४ टक्के अधिक मतदान जास्त झाले. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही कमी मतदान होईल की काय, अशी चर्चा सगळीकडे होती. परंतु तरुणांनी उत्साह दाखवल्याने ही चर्चा अखेर फोल ठरली.लग्नापूर्वी पार पाडले राष्ट्रीय कर्तव्यवाई तालुक्यातील बावधन येथे राहणारे शिवराज देवराम ठोंबरे (वय २४) हे सैन्यदलात कार्यरत आहेत. मंगळवार, दि. २३ रोजी त्यांचा विवाहसोहळा कोपर्डे येथे पार पडला. विवाहाला जाण्यापूर्वी त्यांनी बावधन जिल्हा परिषद शाळेतील केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. यानंतर वºहाडी मंडळींसह ते विवाह सोहळ्यासाठी कोपर्डे येथे निघून गेले. शिवराज ठोंबरे यांनी लग्नापूर्वी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. मतदान हा आपला अधिकार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणे गरजेचे आहे.प्रत्येक निवडणुकीत त्यांनी केले मतदान१९५२ सालापासून साताºयात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मत देऊन शहरातील ९० ते ९४ वर्षीय दाम्पत्य असलेल्या जागरुक मतदारांनी एक अनोखा आदर्श प्रस्थापित केला आहे. पांडुरंग मारुती संकपाळ (वय ९४) व शकुंतला संकपाळ (वय ९०) दाम्पत्यानी उपनगरातील गोडोलीत मतदान केले. तसेच माण तालुक्यातील लतिका शिवराम कुलकर्णी, कºहाड तालुक्यातील हरपळवाडी येथील गुणाबाई काळभोर तर जावळी तालुक्यातील मामुर्डी येथील वेणुबाई धनवडे यांनी मतदान केले.