शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

साताऱ्यात लवकरच हेल्मेट सक्ती होणार, वर्षभरात अपघातात गेले 'इतके' जीव

By दीपक शिंदे | Updated: March 11, 2024 15:27 IST

बळींची संख्या रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी होणार

सातारा: जिल्ह्यात अपघातातील बळींची संख्या वाढत असल्याने जिल्हा पोलिस प्रशासन चिंतेत आहे. त्यामुळे भविष्यात हे अपघात रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे असून, कार चालविताना सीटबेल्ट आणि दुचाकी चालविताना हेल्मेट सक्ती करण्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत.जिल्ह्यात रोज अनेक ठिकाणी भीषण अपघात होत आहेत. यामध्ये अनेकांना आपला नाहक जीव गमवावा लागत आहे. रस्त्यातील खड्डे, धोकादायक वळण, ब्लॅकस्पाॅट हटविण्यात आले तरी सुद्धा मृत्यूचा आकडा का वाढत आहे. यावर जिल्हा पोलिस दलाने आढावा घेतला. त्यावेळी कार चालविताना सीटबेल्ट आणि दुचाकी चालविताना हेल्मेट न घातल्यामुळे अनेकांचा जीव गेल्याचे समोर आले. परिवहन आयुक्तांनी मार्च २०२२ मध्ये हेल्मेट सक्तीचे परिपत्रक काढले होते. हेल्मेट आणि सीटबेल्ट बंधनकारक करण्यात आले असताना अनेकजण हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करीत नाहीत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर विमा कंपनी देखील अपघातावेळी दुचाकी चालकाने हेल्मेट घातले होते का किंवा चारचाकी चालकाने सीटबेल्ट लावला होता का, याची पडताळणी करते. त्यामुळे हेल्मेट व सीटबेल्ट घातल्यास आपला जीव वाचविता येईल. तसेच विम्यासाठी क्लेम करणे देखील सोयीचे होते. या सर्व बाबींचा विचार करून सातारा जिल्ह्यात लवकरच हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. सुरूवातीला वाहनधारकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्यानंतर कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.

वर्षेभरात अपघातात ५०१ जणांचा मृत्यूजिल्ह्यात २०२३ मध्ये अपघातात तब्बल ५०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४५ खुनाचे प्रकार घडले असून, ४८ जणांनी आत्महत्या केली आहे. म्हणजे सर्वाधिक बळी हे अपघातातील असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अपघातात जाणारे नाहक जीव वाचविण्यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली जाणार आहे.

आता पोलिसही नोंद घेणारअपघात झाल्यानंतर दुचाकीस्वाराने हेल्मेट अथवा कार चालकाने सीट बेल्ट लावला होता का, हे पोलिस आता त्यांच्या खबरी अहवालामध्ये नोंद करणार आहेत. पूर्वी अशाप्रकारची नोंद केली जात नव्हती. त्यामुळे अपघातातील मृत व्यक्तीचे कारण समोर येत नव्हते.

वाहन चालकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी सजग असायला हवे. वर्षभरात सीटबेल्ट आणि हेल्मेट न घातल्याने बऱ्याच लाेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यामुळे सुरूवातीला वाहन चालकांमध्ये जनजागृती करून नंतर हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली जाणार आहे. - समीर शेख-पोलिस अधीक्षक, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातPoliceपोलिस