शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात लवकरच हेल्मेट सक्ती होणार, वर्षभरात अपघातात गेले 'इतके' जीव

By दीपक शिंदे | Updated: March 11, 2024 15:27 IST

बळींची संख्या रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी होणार

सातारा: जिल्ह्यात अपघातातील बळींची संख्या वाढत असल्याने जिल्हा पोलिस प्रशासन चिंतेत आहे. त्यामुळे भविष्यात हे अपघात रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे असून, कार चालविताना सीटबेल्ट आणि दुचाकी चालविताना हेल्मेट सक्ती करण्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत.जिल्ह्यात रोज अनेक ठिकाणी भीषण अपघात होत आहेत. यामध्ये अनेकांना आपला नाहक जीव गमवावा लागत आहे. रस्त्यातील खड्डे, धोकादायक वळण, ब्लॅकस्पाॅट हटविण्यात आले तरी सुद्धा मृत्यूचा आकडा का वाढत आहे. यावर जिल्हा पोलिस दलाने आढावा घेतला. त्यावेळी कार चालविताना सीटबेल्ट आणि दुचाकी चालविताना हेल्मेट न घातल्यामुळे अनेकांचा जीव गेल्याचे समोर आले. परिवहन आयुक्तांनी मार्च २०२२ मध्ये हेल्मेट सक्तीचे परिपत्रक काढले होते. हेल्मेट आणि सीटबेल्ट बंधनकारक करण्यात आले असताना अनेकजण हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करीत नाहीत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर विमा कंपनी देखील अपघातावेळी दुचाकी चालकाने हेल्मेट घातले होते का किंवा चारचाकी चालकाने सीटबेल्ट लावला होता का, याची पडताळणी करते. त्यामुळे हेल्मेट व सीटबेल्ट घातल्यास आपला जीव वाचविता येईल. तसेच विम्यासाठी क्लेम करणे देखील सोयीचे होते. या सर्व बाबींचा विचार करून सातारा जिल्ह्यात लवकरच हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. सुरूवातीला वाहनधारकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्यानंतर कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.

वर्षेभरात अपघातात ५०१ जणांचा मृत्यूजिल्ह्यात २०२३ मध्ये अपघातात तब्बल ५०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४५ खुनाचे प्रकार घडले असून, ४८ जणांनी आत्महत्या केली आहे. म्हणजे सर्वाधिक बळी हे अपघातातील असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अपघातात जाणारे नाहक जीव वाचविण्यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली जाणार आहे.

आता पोलिसही नोंद घेणारअपघात झाल्यानंतर दुचाकीस्वाराने हेल्मेट अथवा कार चालकाने सीट बेल्ट लावला होता का, हे पोलिस आता त्यांच्या खबरी अहवालामध्ये नोंद करणार आहेत. पूर्वी अशाप्रकारची नोंद केली जात नव्हती. त्यामुळे अपघातातील मृत व्यक्तीचे कारण समोर येत नव्हते.

वाहन चालकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी सजग असायला हवे. वर्षभरात सीटबेल्ट आणि हेल्मेट न घातल्याने बऱ्याच लाेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यामुळे सुरूवातीला वाहन चालकांमध्ये जनजागृती करून नंतर हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली जाणार आहे. - समीर शेख-पोलिस अधीक्षक, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातPoliceपोलिस