शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी दुपारपर्यंत ५० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 2:48 PM

सातारा जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी दुपारपर्यंत सुमारे ५० टक्के मतदान झाले होते. चुरशीने मतदान होत असल्याने सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यांच्यावर जाईल, असे संकेत मिळत आहेत. तसेच मतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देमतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार नसल्याची माहिती सातारा जिल्ह्यात २५६ ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यांच्यावर जाईल, असे संकेत संवेदनशील ग्रामपंचायतींच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

सातारा : जिल्ह्यातील २५६ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी दुपारपर्यंत सुमारे ५० टक्के मतदान झाले होते. चुरशीने मतदान होत असल्याने सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यांच्यावर जाईल, असे संकेत मिळत आहेत. तसेच मतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती देण्यात आली.

जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यामधील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर काही ठिकाणी एखाद्या-दुसऱ्या जागेसाठी निवडणूक होत आहे. तसेच आज २५६ ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे.

सकाळपासून मतदानाला प्रारंभ झाला होता. अनेक ठिकाणी चुरशीने मतदान सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.

सकाळी साडेअकरापर्यंत जिल्ह्यात ४०.४८ टक्के इतके मतदान झाले होते. तर दोन वाजेपर्यंत ५० टक्क्यांच्यावर मतदानाचा आकडा गेला होता. संवेदनशील असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच