शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

सातारा जिल्ह्यात जुलैअखेर सरासरीपेक्षा अधिक पाऊस, महाबळेश्वरला कमी पर्जन्यमान 

By नितीन काळेल | Updated: August 5, 2024 19:11 IST

इतर १० तालुक्यात जादा पर्जन्यमान

सातारा : जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असून जून ते जुलैदरम्यान ७२३ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. दोन महिन्यात सरासरीच्या ४४ टक्के अधिक पाऊस बरसला आहे. तर यामध्ये महाबळेश्वर तालुक्यात पाऊस कमी झाला असलातरी तरी इतर १० तालुक्यात जादा पर्जन्यमान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.सातारा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ८८६.२ मिलिमीटर पाऊस पडतो. पण, यावर्षी जून महिन्यात मान्सूनचा पाऊस वेळेत दाखल झाला. त्यामुळे जिल्हावासीयांना पावसाची प्रतीक्षा करावी लागली नाही. तरीही जूनमध्ये सुरूवातीला चांगला पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले होते. परिणामी चिंता वाढलेली. पण, जुलै महिनाच्या पहिल्या आठवड्यानंतर धुवाॅंधार पाऊस सुरू झाला. पूर्व तसेच पश्चिम भागातही धो-धो पाऊस झाला. यामुळे तलाव, धरणांतील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यातच मागील १५ दिवसांत तुफान वृष्टी झाल्याने पावसाने वार्षिक सरासरीकडे आगेकूच केल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात जून ते जुलै या दोन महिन्यांत सरासरी ५०१.३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद होते. पण, प्रत्यक्षात ७२३ मिलिमीटर पाऊस बरसला. हे प्रमाण ४४ टक्के अधिक आहे. म्हणजेच दोन महिन्यात सरासरी १४४.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये १० तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला असल्याचे समोर आलेले आहे. तर जुलैपर्यंतची तुलना करता कऱ्हाड तालुका, फलटण आणि खटाव तालुक्यात २०० टक्क्यांहून अधिक पाऊस झालेला आहे.त्यातच अजुनही पावसाचे दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे यावर्षी जिल्ह्याचा पाऊसही वार्षिक सरासरी ओलांडणार हे स्पष्ट आहे. त्याचबरोबर गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने कोयनेसह बहुतांशी धरणे भरली नव्हती. यंदा मात्र, आताच ही धरणे ८० टक्क्यांवर भरली आहेत. त्यामुळे आॅगस्टमध्येच ही धरणे पूर्ण भरणार आहेत. त्यामुळे चिंता मिटणार आहे.

जून ते जुलै दरम्यानची पावसाची आकडेवारी (मिलिमीटरमध्ये)तालुका  - पाऊस - अपेक्षित झाला - टक्केवारी

सातारा - ४५२.८ - ६८९.९ - १५०.६जावळी - ८३५.४ - १,२६८ - १५१.९पाटण  - ९९०.९ - १,११७.८ - ११२.८कऱ्हाड - ३३५.२ - ६७४.४ - २०१.२कोरेगाव - ३५४.३ - ५२८.३ - १४९.१खटाव - १८९.६ - ४०३ - २१२.६माण - १७०.५ - ३०१.७ - १७७फलटण - १५४.९ - ३२९  - २१२.४खंडाळा - २०२.२ - २९२.८ - १४४.८वाई - ४०२ - ६३५.३ - १५८महाबळेश्वर - ३,१११.९ - २,४६८.३ - ७९.३

दुष्काळी तालुके आबादाणी..जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण हे प्रचंड दुष्काळी तालुके. गेल्यावर्षी या तालुक्यात कमी पर्जन्यमान झाल्याने दुष्काळ पडलेला. लोकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा मात्र, हे तालुके जुलैमध्येच आबादाणी झाले आहेत. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यात दोन महिन्यात अधिक पाऊस झाला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान