शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात वर्षभरात तब्बल ४१ हजार नवी वाहने रस्त्यावर !

By admin | Updated: March 25, 2017 13:08 IST

वाहतुकीची समस्या होणार बिकट : नोटाबंदीच्या काळात प्रमाण घटले

सातारा : प्रत्येकाकडे स्वत:चे वाहन असणे हे आजकाल प्रतिष्ठेपेक्षा गरजेचे बनले आहे. त्यामुळे मोटारसायकल असो किंवा कार ही दारात हवीच, अशा अपेक्षा आता वाढू लागल्या आहेत. परिणामी वाहन खरेदीदारांची संख्या दिवसागणीक वाढतच आहे. कऱ्हाड आणि पाटण तालुका वगळता जिल्ह्यात सध्या ७ लाख ३ हजार ५४८ वाहने असून, दरवर्षी ४१ हजार नवी वाहने रस्त्यावर धावत आहेत.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वेळेला खूप महत्त्व आहे. ह्यथांबला तो संपलाह्ण या म्हणीप्रमाणे प्रत्येकजण धावत असतो. पूर्वी एखादं वाहन घरात असावं, हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जात होतं. परंतु जसा काळ बदलला तशी लोकांची विचारसरणीही बदलत चाललीय. त्यामुळे गरज ओळखून वाहन खरेदीकडे लोकांचा ओढा वाढल्याचे दिसून येत आहे. घरात जेवढ्या व्यक्ती तेवढी वाहने, असे समीकरण आता आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाहन खरेदीकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.

२०१४-२०१५ या कालावधीत ६ लाख १५ हजार ९४४ वाहनांची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. तर २०१५-२०१६ ला ६ लाख ६१ हजार ९८१ वाहने आणि २०१६-१७ ला (१७ फेब्रुवारपर्यंत) ७ लाख ३ हजार ५४८ वाहनांची नोंद झाली आहे. २०१४-१५च्या तुलनेत २०१५-१६ ला ४६ हजार ३७ तर २०१६-१७ ला ४१ हजार ५६७ वाहनांची खरेदी झाली. म्हणजे यंदा ४ हजार ४७० ने वाहनांचे प्रमाण कमी झाले. वाहन खरेदीला नोटाबंदीचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. परंतु नोटाबंदीचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा झपाट्याने वाहन खरेदी होऊ लागले आहे.

पाच वर्षांपूर्वी कऱ्हाडला स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले. त्यामुळे या कार्यालयातील वाहनांची संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे. परिणामी वाहतुकीची समस्या आणखीनच बिकट होण्याची चिन्हे आहेत. सातारा, खंडाळा, फलटण, वाई, महाबळेश्वर, माण, कोरेगाव या मुख्य तालुक्यांमध्ये वाहन पार्किंगची मुख्य समस्या भेडसावू लागली आहे. टुरिस्ट वाहनांना पार्किंगचा दाखला द्यावा लागतो. त्याप्रमाणे इतर वाहने खरेदी करतानाही पार्किंगची सोय आहे की नाही, याचा दाखला देणे वाहनधारकाला बंधनकारक करावे, अशी अपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)नोटाबंदीच्या काळामध्ये वाहन खरेदीचे प्रमाण घटले होते. परंतु त्यानंतर पुन्हा वाहन खरेदी होऊ लागली आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था तातडीने करणे गरजेचे आहे.- संजय धायगुडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा