शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कोयनेतून ३२ हजार क्यूसेकने विसर्ग, धरणाचे दरवाजे साडे तीन फुटापर्यंत उचलले

By नितीन काळेल | Updated: September 14, 2022 15:19 IST

पूर्व दुष्काळी भागातही पावसाने चांगली हजेरी लावली

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम  भागात जोरदार पाऊस होत असून आज, बुधवारी सकाळपर्यंत कोयनेत १०६, नवजा येथे १३७ तर महाबळेश्वरला ११६ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात सुमारे १०४ टीएमसी साठा झाला आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे साडे तीन फुटापर्यंत उचलून  विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणातून एकूण ३२ हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. पूर्व दुष्काळी भागातही पावसाने चांगली हजेरी लावली. तर पश्चिम भागातील कास, नवजा, बामणोली, तापोळा, कोयना, महाबळेश्वर भागात काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे कोयनासह धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी अशा प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे.कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून दोन दिवसांपूर्वी विसर्ग सुरु करण्यात आलेला. त्यानंतर सोमवारी रात्री दरवाजे दीड फुटांनी उचलून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. यावर्षीच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदाच दरवाजे उघडण्यात आले. तर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहून बुधवारी सकाळी ११ पासून सहा दरवाजे साडे तीन फुटांपर्यंत वर उचलण्यात आले आहेत. पायथा वीजगृह १०५० आणि दरवाजातून ३१,५३१ क्यूसेक विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यामुळे कोयनेतून एकूण ३२,५८१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. हे पाणी कोयना नदीपात्रात जात असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, जूनपासून आतार्पंत कोयनेला ४,२४७ मिलीमीटरची नोंद झाली आहे. तर नवजा येथे ५,१७४ आणि महाबळेश्वरला ५,४९२ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याचबरोबर माण, खटाव, फलटण या तालुक्यातही पावसाची हजेरी आहे.

उरमोडीतून १९३४ क्यूसेक विसर्ग...उरमोडी धरणक्षेत्रातही चांगला पाऊस होत आहे. त्यातच धरणात ९.८९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हे धरण भरल्यातच जमा आहे. या धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सकाळच्या सुमारास विद्युत गृहातून ५०० आणि सांडवा १४३४ असा एकूण १९३४ क्यूसेक विसर्ग सुरु होता.

वीरमधून १६ हजार क्यूसेक विसर्ग...पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील वीर धरणातूनही विसर्ग वाढविण्यात आला आहे. उजवा कालवा विद्युतगृह ११००, डावा कालवा विद्युतगृह ९०० क्यूसेक विसर्ग होत आहे. तर धरणाच्या सांडव्यातून मंगळवारी रात्रीपासून १३,९११ क्यूसेक विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे वीर धरणातून एकूण १५,९११ क्यूसेक विसर्ग नीरा नदीपात्रात होत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणWaterपाणी