शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पात १३४ टीएमसी पाणीसाठा, कोयनेतून १०५० क्यूसेक विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 19:49 IST

अजूनही सिंचनासाठी कमीच मागणी : कोयनेत ९४ टीएमसीवर पाणी उपलब्ध

सातारा : जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने सर्वच धरणे भरली होती. तसेच, चांगली पाणीसाठाही झाला होता. यामुळे रब्बी हंगामातील सिंचनासाठी अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी मागणी नाही. या कारणाने जिल्ह्यातील प्रमुख सहा मोठ्या प्रकल्पात सध्या सुमारे १३४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तर, कोयना धरणात अजूनही ९४.७४ टीएमसी पाणीसाठा आहे.सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने खरीप आणि रब्बी असे दोन प्रमुख हंगाम घेतले जातात. येथील शेती पावसावर अवलंबून आहे. तसेच, धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावरही हंगाम घेतला जातो. मान्सूनचा पाऊस चांगला झाला, तर शेतीसाठी पाणी पुरेसे होते. मागील दोन वर्षांत जिल्ह्यात चांगला पाऊस होत आला आहे. यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांनाही पाण्याची टंचाई जाणवली नाही. तसेच, जिल्ह्यातील काही धरणांतील पाणी हे साताऱ्याबरोबरच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठीही जाते.जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी अशी प्रमुख सहा धरणे आहेत. या धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १४८ टीएमसी आहे. यामध्ये सर्वाधिक मोठे धरण हे कोयना असून, पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती होते. तसेच, सिंचन आणि पिण्यासाठीही पाणी सोडले जाते.मागीलवर्षीप्रमाणे यंदाही कोयना धरण भरलेले होते. तसेच, इतर सर्व प्रमुख धरणेही भरून वाहिली. त्यामुळे यंदा सिंचन आणि पिण्यासाठी पाणी कमी पडणार नाही. सध्या कोयना धरणात ९० टक्के पाणीसाठा आहे. तसेच, इतर प्रमुख धरणांतही चांगला पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच यंदा अजूनही सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी नाही. त्यामुळे धरणांतून विसर्ग कमी आहे. काही धरणांतून पाणी बंद आहे. तरीही पुढील महिन्यापासून सिंचनासाठी मागणी वाढणार आहे. त्यानंतरच सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे.

मागीलवर्षीपेक्षा सहा टीएमसी साठा कमी...जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणे मागीलवर्षी पूर्णपणे भरली होती. सध्या या सहा धरणांत एकूण १३३.७८ टीएमसी पाणीसाठा आहे. तर, गेल्यावर्षी १७ डिसेंबरला याच धरणांमध्ये १४०.२९ टीएमसी पाणसाठा होता. यावरून यंदा धरणांत सुमारे सहा टीएमसी पाणीसाठा कमी आहे. कोयना धरणात मागीलवर्षी सुमारे ९९ टीएमसी पाणी होते. यावर्षी साठा कमी झालेला आहे.

कोयनेतून १०५० क्यूसेक विसर्ग...जिल्ह्यातील प्रमुख काही धरणांतून विसर्ग सुरू आहे. यामध्ये कोयनेच्या पायथा वीजगृहातून १ हजार ५० क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे. त्याचबरोबर कण्हेर धरणातून १५०, तारळीमधून २७६ आणि धोम धरणातून ५७३ क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा...धरण - सध्या साठा - टक्केवारी - एकूण साठाधोम - ११.७७ - ८७.१४ - १३.५०कण्हेर - ९.१४ - ९०.५२ - १०.१०कोयना - ९४.७४ - ९० - १०५.२५बलकवडी - ४.०५ - ९८.९६ - ४.०८तारळी - ४.४४ - ७५.८१ - ५.८५उरमोडी - ९.६४ - ९६.८४ - ९.९६

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Dams Overflowing: 134 TMC Storage, Koyna Discharges 1050 Cusecs

Web Summary : Satara district's dams are brimming with 134 TMC water storage due to good rainfall. Koyna Dam holds 90% capacity, discharging 1050 cusecs. Six major dams, including Koyna, are near full, ensuring ample water for irrigation and drinking despite lower storage than last year.