शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

साताऱ्यात वाटाण्याला क्विंटलला १० हजार दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:26 IST

सातारा : जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर अजूनही वाढलेलेच असून, सातारा बाजार समितीत तर वाटाण्याला क्विंटलला १० हजारांपर्यंत भाव मिळाला. तर ...

सातारा : जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर अजूनही वाढलेलेच असून, सातारा बाजार समितीत तर वाटाण्याला क्विंटलला १० हजारांपर्यंत भाव मिळाला. तर किरकोळ विक्री १४० रुपये किलापर्यंत गेली आहे. दरम्यान, खाद्यतेल डब्याचा दर जैसे थे असून, पाऊचमागे ५ ते १० रुपये उतार आलेला आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. रविवारी ६४८ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. कांद्याची अधिक आवक झाली नसली तरी क्विंटलला २ हजारांपर्यंत दर मिळाला तर वांग्याचाही दर वाढल्याचे दिसून आले. वांग्याला १० किलोला ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ५० ते ७० रुपये आणि फ्लॉवरला १० किलोला २०० ते २५० रुपये भाव मिळाला. आल्याला क्विंटलला दीड हजार रुपये तर लसणाला ७ हजारांपर्यंत दर मिळाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर वाटाण्याला ९ ते १० हजारांपर्यंत भाव मिळाला. आठवड्यात क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ झालेली आहे.

खाद्यतेल बाजारभाव...

मागील तीन आठवड्यांपासून खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. सध्या खाद्यतेलाचा सूर्यफूल डबा २,४००पर्यंत मिळत आहे. तर पामतेलचा १,८०० ते १,८५०, शेंगदाणा तेल डबा २,४०० ते २,४५० आणि सोयाबीनचा २,१५० ते २,२०० रुपयांपर्यंत मिळत आहे. सोयाबीन तेल पाऊच १३५ ते १४० रुपये, सूर्यफूलचा पाऊच १७० रुपयांना मिळत आहे.

डाळिंबाची आवक

बाजार समितीत आंब्याची आवक पूर्णपणे बंद झाली आहे तर डाळिंब आणि पपई आली होती. डाळिंबाची १२ व पपईची १८ क्विंटलची आवक झाली.

बटाटा अजून स्वस्त...

बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर वाढले आहेत; पण बटाट्याला अद्यापही दर कमी आहे. क्विंटलला १,४०० ते १,६०० रुपये दर मिळाला. तर दोडक्याला १० किलोला ५०० ते ५५० रुपये, ढबू ३०० ते ३५० रुपये, शेवगा शेंग व पावटा ६०० ते ७०० रुपये, गवारला ३५० ते ४०० रुपये दर १० किलोला मिळाला.

प्रतिक्रिया...

मागील काही महिन्यांपासून खाद्यतेल दरात वाढ झालेली. पण, सध्या अमेरिकेत बायोडिझेलला तेल वापर कमी झाला आहे. त्यामुळे खाद्यतेल बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. त्यामुळे दर उतरला

- संभाजी आगुंडे,

विक्री प्रतिनिधी

मागील १५ दिवसांपासून पालेभाज्याचे दर वाढलेले आहेत. कोणतीही भाजी ४० रुपयांच्या पुढे आहे. वाटाणा तर १२० रुपयांवर गेला आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांचा भाज्यावरच अधिक खर्च होत असल्याचे दिसून येत आहे.

- शांताराम यादव, ग्राहक

सातारा बाजार समितीत वाटाण्याला क्विंटलला १० हजारापर्यंत दर मिळाला. यामुळे समाधान वाटत आहे. त्याचबरोबर कांद्याला दर अजुन कमी आहे. इतर भाज्यांना चांगला दर मिळू लागला आहे.

- रामभाऊ पवार, शेतकरी

.................................................................................................................................................................