शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
2
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
5
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
6
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
7
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
8
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
9
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
10
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
11
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
12
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
13
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
15
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
16
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
17
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
18
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
19
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
20
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद

पसरणी घाटात तयार केले १०० समतल चर :-वाईत उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 1:06 AM

वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात वाईतील सेवाभावी संस्थेने ‘आपले पाणी आपल्या रानी’ या संकल्पनेचा ध्यास घेऊन ‘पाणी अडवा पाणी जिरवा’चे काम हाती घेतले आहे. घाटात नैसर्गिक स्त्रोत असणाऱ्या ठिकाणी सीसीटी बंधारे तयार करून पाणी अडवून राहण्यासाठीचे नियोजन केले आहे. सेवाभावी

ठळक मुद्दे‘आपले पाणी आपल्या रानी’ची संकल्पना; पाणी संवर्धन, झाडे लावण्याचा ध्यास

वाई : वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात वाईतील सेवाभावी संस्थेने ‘आपले पाणी आपल्या रानी’ या संकल्पनेचा ध्यास घेऊन ‘पाणी अडवा पाणी जिरवा’चे काम हाती घेतले आहे. घाटात नैसर्गिक स्त्रोत असणाऱ्या ठिकाणी सीसीटी बंधारे तयार करून पाणी अडवून राहण्यासाठीचे नियोजन केले आहे. सेवाभावी संस्थेने जवळ-जवळ शंभर सीसीटी बंधारे व दीडशे झाडांचे वृक्षारोपणासाठी खड्डे तयार केले आहेत. त्यामध्ये पावसाळ्यात पाणी साठल्यास दर वर्षी उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई निश्चितच कमी होण्यास मदत होणार आहे.

वाई भागात पावसाचे प्रमाण इतर तालुक्यांच्या मानाने चांगले असते. परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण कसे राहणार? हे काही दिवसांतच समजणार आहे, हवामान खात्याने धोक्याची घंटा वाजविल्याने त्या मानाने पाऊस कमी पडल्यास पाण्याचे दुर्भिक्ष या भागातही जाणवण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन पाणी संचय व वृक्षारोपण करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. पसरणी घाटात मार्च, एप्रिलमध्येच पाणी टंचाई जाणवल्याने संपूर्ण घाटात याच काही संस्थांच्या माध्यमातून पक्ष्यांना व सरपटणाºया प्राण्यांसाठी पाण्याची भांडी बांधण्यात आली आहेत. त्याचे अनुकरण इतरही तालुक्यांतील घाटांमध्ये करण्यात आले आहे.

संपूर्ण चार महिन्यांत पाणी मिळाल्याने पक्ष्यांचा तसेच प्राण्यांचा मृत्यू झाला नाही, हेच या संस्थेचे मोठे यश आहे.पाणी टंचाईवर उपाय म्हणून वाईतील सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले आहे. हे बंधारे कृषी विभागाकडून बांधणे अपेक्षित असताना या विभागाकडून असे कोणतेही नियोजन होताना दिसत नाही.पाचशे झाडांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प प्रशांत डोंगरे, महेश खरात यांच्या सेवाभावी संस्थेने केला. यावर्षी १०० सीसीटी बंधारे व १५० झाडांचे वृक्षारोपण करण्यासाठी नियोजन केले. यामध्ये शंभर पिंपळ, १०० आवळा, १०० बहावा तर इतरही काही औषधी झाडांचे वृक्षारोपण करण्यात येऊन त्यांचे योग्य प्रकारे संगोपन करण्याचा संकल्प केला आहे.पसरणी घाटामध्ये तरुणांकडून समतल चर काढले जात आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater shortageपाणीटंचाई