शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाची पुनर्रचना पूर्ण, 'या' महिन्यांनंतरच निवडणुका होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 17:16 IST

नवीन मतदारसंघानुसारच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट

सांगली : जिल्हा परिषद ६८ आणि पंचायत समिती १३६ मतदारसंघाची पुनर्रचना महसूल विभागाकडून जवळपास पूर्ण झाली आहे. या मतदारसंघ पुनर्रचनेत सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधकांच्या मतदारसंघाची तोडफोड केल्याचा इच्छुकांकडून आरोप होत आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेचा प्रारूप आराखडा कधी प्रसिद्ध होणार? आणि मतदारसंघ कसा असेल? याची उत्सुक्ताही इच्छुकांना लागली आहे. नवीन मतदारसंघानुसारच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समित्यांच्या गणांचा कच्चा आराखडा तयार करून तो ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत सादर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या मुदतीत गट व गणांचा कच्चा आराखडा तयार केला; परंतु तो प्रसिद्ध केला नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांना मतदारसंघ कसा असेल, याची उत्सुकता शिगेला लागली आहे. याबरोबरच महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रशासनाला हाताशी धरून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे मतदारसंघ आपल्या कार्यकर्त्यांच्या सोयीचे केले आहेत, असा काही जिल्हा परिषद सदस्यांकडून आरोप होत आहे. काही सदस्यांना आपल्या मतदारसंघाचे खूपच खूपच तोडफोड केल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोहोचली आहे. यामुळे ते सदस्य खूपच चिंतित आहेत.निवडणुका मे महिन्यातजिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांची मुदत २१ मार्च २०२२ रोजी, तर दहा पंचायत समित्यांचा कार्यकाळ १३ मार्च २०२२ ला संपत आहे. कमाल १२ जानेवारी २०२२ पर्यंत या निवडणुकीची आचारसंहिता लागू होणे आवश्यक होते. परंतु, अद्याप गट, गणरचना व त्यांची आरक्षण सोडत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. या प्रक्रियेसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नियोजित मुदतीत निवडणूक होणार नाही हे निश्चित झाले आहे. 

राज्य निवडणूक आयोगानेही दोन महिने निवडणुका पुढे जाणार असे जाहीर केले आहे. या सर्वांचा विचार केल्यास मे महिन्यांनंतरच निवडणुका होणार हे निश्चित झाले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाची पुनर्रचना पूर्ण झाली असेल तर प्रशासनाने प्रारूप आराखडा जनतेसाठी खुला करावा. गुपचूप मतदारसंघाची तोडफोड करून जनतेला अंधारात ठेवले तर आम्ही न्यायालयात जाणार आहे. भौगोलिक विचार करूनच मतदारसंघाची पुनर्रचना झाली पाहिजे. यामध्ये काही गोलमाल केले तर न्यायालयात आम्ही धाव घेणार आहे.  -जितेंद्र पाटील, जिल्हा परिषदेतील पक्षप्रतोद, काँग्रेस

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकzpजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समिती