शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाची पुनर्रचना पूर्ण, 'या' महिन्यांनंतरच निवडणुका होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 17:16 IST

नवीन मतदारसंघानुसारच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट

सांगली : जिल्हा परिषद ६८ आणि पंचायत समिती १३६ मतदारसंघाची पुनर्रचना महसूल विभागाकडून जवळपास पूर्ण झाली आहे. या मतदारसंघ पुनर्रचनेत सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधकांच्या मतदारसंघाची तोडफोड केल्याचा इच्छुकांकडून आरोप होत आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेचा प्रारूप आराखडा कधी प्रसिद्ध होणार? आणि मतदारसंघ कसा असेल? याची उत्सुक्ताही इच्छुकांना लागली आहे. नवीन मतदारसंघानुसारच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समित्यांच्या गणांचा कच्चा आराखडा तयार करून तो ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत सादर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या मुदतीत गट व गणांचा कच्चा आराखडा तयार केला; परंतु तो प्रसिद्ध केला नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांना मतदारसंघ कसा असेल, याची उत्सुकता शिगेला लागली आहे. याबरोबरच महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रशासनाला हाताशी धरून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे मतदारसंघ आपल्या कार्यकर्त्यांच्या सोयीचे केले आहेत, असा काही जिल्हा परिषद सदस्यांकडून आरोप होत आहे. काही सदस्यांना आपल्या मतदारसंघाचे खूपच खूपच तोडफोड केल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोहोचली आहे. यामुळे ते सदस्य खूपच चिंतित आहेत.निवडणुका मे महिन्यातजिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांची मुदत २१ मार्च २०२२ रोजी, तर दहा पंचायत समित्यांचा कार्यकाळ १३ मार्च २०२२ ला संपत आहे. कमाल १२ जानेवारी २०२२ पर्यंत या निवडणुकीची आचारसंहिता लागू होणे आवश्यक होते. परंतु, अद्याप गट, गणरचना व त्यांची आरक्षण सोडत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. या प्रक्रियेसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नियोजित मुदतीत निवडणूक होणार नाही हे निश्चित झाले आहे. 

राज्य निवडणूक आयोगानेही दोन महिने निवडणुका पुढे जाणार असे जाहीर केले आहे. या सर्वांचा विचार केल्यास मे महिन्यांनंतरच निवडणुका होणार हे निश्चित झाले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघाची पुनर्रचना पूर्ण झाली असेल तर प्रशासनाने प्रारूप आराखडा जनतेसाठी खुला करावा. गुपचूप मतदारसंघाची तोडफोड करून जनतेला अंधारात ठेवले तर आम्ही न्यायालयात जाणार आहे. भौगोलिक विचार करूनच मतदारसंघाची पुनर्रचना झाली पाहिजे. यामध्ये काही गोलमाल केले तर न्यायालयात आम्ही धाव घेणार आहे.  -जितेंद्र पाटील, जिल्हा परिषदेतील पक्षप्रतोद, काँग्रेस

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकzpजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समिती