शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

येळापूरच्या तरुणाकडून भावजय, पुतण्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:28 IST

कोकरूड/पनवेल : चव्हाणवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथील दिराने आपली भावजय व दोन वर्षांच्या पुतण्याची हत्या केल्याची घटना कामोठे शहरात ...

कोकरूड/पनवेल : चव्हाणवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथील दिराने आपली भावजय व दोन वर्षांच्या पुतण्याची हत्या केल्याची घटना कामोठे शहरात सोमवारी रात्री उशिरा उघड झाली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यातआली असून, त्याच्यावर हत्येचा गुन्हादाखल करण्यात आला आहे. जयश्री योगेश चव्हाण (वय २२) व अविनाश चव्हाण (२) अशी हत्या झालेल्यांची नावेआहेत.योगेश चव्हाण (मूळ गाव चव्हाणवाडी, येळापूर, ता. शिराळा) हे कामानिमित्त कामोठे सेक्टर ३४ येथील एकदंत सोसायटीतील रूम नंबर ३०४ मध्ये पत्नी जयश्री (२२), मुलगा अविनाश (२) व भाऊ सुरेश (३०) यांच्यासह राहतात. योगेश हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत असून सोमवारी ते कामावर गेले होते. सुरेश हा योगेशचा मोठा भाऊ असून अविवाहित आहे. त्यांचे आई-वडील हे गणपतीसाठी शिराळा, सांगली या आपल्या गावी गेले होते.सुरेश काही दिवसांपासून बेकार होता. काही कामधंदा करीत नसल्याने त्याचे घरातल्यांसोबत नेहमी खटके उडत होते. आई-वडील व भावासोबत भांडण होत असे. त्यातून काही दिवसांपूर्वी योगेशने सुरेशला घराबाहेर काढले होते. याच गोष्टीचा प्रचंड राग सुरेशच्या मनात होता. तोच राग मनात ठेवून सोमवारी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत सुरेश योगेशच्या घरी गेला. भावजय जयश्रीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने जयश्रीला ठार मारले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने जयश्रीचा दोन वर्षाचा मुलगा अविनाश याच्यावरही राग काढला. उशीने तोंड दाबून त्याचाही जीव घेतला. या प्रकारानंतर सुरेश घरात बसून राहिला व झोपी गेला.सोमवारी रात्री ११ च्या सुमारास योगेश घरी आल्यानंतर त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा उघडता आला नाही. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांची मदत घेऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.यावेळी सुरेश हॉलमध्ये झोपला होता तर जयश्री व मुलगा अविनाश यांचे मृतदेह बेडरूममध्ये आढळले. त्यामुळे योगेशने कामोठे पोलिसांना याबाबत माहिती दिली. कामोठे पोलिसांनी घटनास्थळावरून सुरेशला अटक केली आहे. याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू असल्याचे कामोठे पोलिसांनी सांगितले.जयश्रीचा छळ झाल्याचा नातेवाइकांंचा आरोपजयश्री व अविनाश यांची सुरेशने दुपारीच हत्या केल्याचे समोर आले आहे. जयश्रीचे माहेर आटूगडेवाडी-मेणी (शिराळा, सांगली) येथील असून, तिचे योगेश सोबत ३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. चव्हाण कुटुंबीय १५ वर्षांपासून कामोठे येथे राहत आहेत, तर सासरी जयश्रीचा छळ सुरू होता, असा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.