शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

चांदोली धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार का? दोन वर्षापासून अधिकारीच फिरकले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:55 IST

चांदोली धरण महाराष्ट्रातील मातीचे दुसऱ्या क्रमांकाचे धरण असून ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. पण, धरण प्रशासनाचे अधिकारी गेल्या दोन वर्षांत इकडे फिरकलेच नाहीत. सहा महिन्यांपासून धरणाच्या भिंतीवरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून भिंतीवरील पथदिवे बंद : सीसीटीव्ही कॅमेरे बंद

गंगाराम पाटील ।वारणावती : चांदोली धरण महाराष्ट्रातील मातीचे दुसऱ्या क्रमांकाचे धरण असून ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. पण, धरण प्रशासनाचे अधिकारी गेल्या दोन वर्षांत इकडे फिरकलेच नाहीत. सहा महिन्यांपासून धरणाच्या भिंतीवरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे कोणत्याहीक्षणी धरणाला धोका पोहोचू शकतो. धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाची निर्मिती १९७६ मध्ये झाली. प्रथम १९८४ मध्ये अंशत: पाणीसाठा करण्यात आला, तर १९९२ पासून हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास सुरुवात झाली. याच धरणाच्या पायथ्याशी १६ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प आहे. सिंचनासह वीजनिर्मिती होते. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या ३६७.१७ चौरस किलोमीटरच्या पाणलोट क्षेत्रातून चांदोली धरणात पाण्याची आवक होत असल्याने हा परिसर पावसाचे आगर समजला जातो.

कोकणचे प्रवेशद्वार असणाºया या परिसरात पावसाळ्यात धुवाधार पाऊस, वारा व वारंवार होणाºया भूकंपामुळे हा परिसर संवेदनशील क्षेत्र आहे. पण धरण व पाणी याचे प्रशासन जलसंपदा विभागाकडे, तर वसाहत देखभाल व दुरुस्ती, वीज, पाणी हे कृष्णा खोरे विकास महामंडळ प्रशासनाकडे आहे. धरणाची सुरक्षा पोलीस यंत्रणेकडे व वीजनिर्मिती विद्युत पारेषण कंपनीकडे आहे. धरणाची अशी चार विभागांकडे विभागणी झाली आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रशासनाचा जबाबदार अधिकारी नाही. प्रत्येकजण आपापली जबाबदारी टाळताना दिसत आहे.गेल्या सहा महिन्यांपासून धरणाच्या भिंतीवरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.

वारंवार तक्रारी करूनही धरण प्रशासनाने व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून हे धरण पूर्णपणे अंधारात आहे. त्यामुळे धरणाला कोणत्याही क्षणी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी, सोनवडे, चरण, कोकरुड परिसरातील शेतकºयांनी केली आहे.धरणाला कोणताही धोका नाहीधरणाच्या धोक्याविषयी शाखाधिकारी प्रदीप कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, चांदोली धरण हे राज्यातील मातीचे दुसºया क्रमांकाचे धरण आहे. नाशिक येथील कार्यकारी अभियंत्यांकडून देखभाल, दुरुस्ती केली जाते. वर्षातून दोनवेळा त्याची पाहणी केली जाते. त्याचा अहवाल दिला जातो. धरण मजबूत असून धरणाला कोणताही धोका नाही.

टॅग्स :DamधरणSangliसांगली