शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

चांदोली धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार का? दोन वर्षापासून अधिकारीच फिरकले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:55 IST

चांदोली धरण महाराष्ट्रातील मातीचे दुसऱ्या क्रमांकाचे धरण असून ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. पण, धरण प्रशासनाचे अधिकारी गेल्या दोन वर्षांत इकडे फिरकलेच नाहीत. सहा महिन्यांपासून धरणाच्या भिंतीवरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून भिंतीवरील पथदिवे बंद : सीसीटीव्ही कॅमेरे बंद

गंगाराम पाटील ।वारणावती : चांदोली धरण महाराष्ट्रातील मातीचे दुसऱ्या क्रमांकाचे धरण असून ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. पण, धरण प्रशासनाचे अधिकारी गेल्या दोन वर्षांत इकडे फिरकलेच नाहीत. सहा महिन्यांपासून धरणाच्या भिंतीवरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे कोणत्याहीक्षणी धरणाला धोका पोहोचू शकतो. धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाची निर्मिती १९७६ मध्ये झाली. प्रथम १९८४ मध्ये अंशत: पाणीसाठा करण्यात आला, तर १९९२ पासून हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास सुरुवात झाली. याच धरणाच्या पायथ्याशी १६ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प आहे. सिंचनासह वीजनिर्मिती होते. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या ३६७.१७ चौरस किलोमीटरच्या पाणलोट क्षेत्रातून चांदोली धरणात पाण्याची आवक होत असल्याने हा परिसर पावसाचे आगर समजला जातो.

कोकणचे प्रवेशद्वार असणाºया या परिसरात पावसाळ्यात धुवाधार पाऊस, वारा व वारंवार होणाºया भूकंपामुळे हा परिसर संवेदनशील क्षेत्र आहे. पण धरण व पाणी याचे प्रशासन जलसंपदा विभागाकडे, तर वसाहत देखभाल व दुरुस्ती, वीज, पाणी हे कृष्णा खोरे विकास महामंडळ प्रशासनाकडे आहे. धरणाची सुरक्षा पोलीस यंत्रणेकडे व वीजनिर्मिती विद्युत पारेषण कंपनीकडे आहे. धरणाची अशी चार विभागांकडे विभागणी झाली आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रशासनाचा जबाबदार अधिकारी नाही. प्रत्येकजण आपापली जबाबदारी टाळताना दिसत आहे.गेल्या सहा महिन्यांपासून धरणाच्या भिंतीवरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.

वारंवार तक्रारी करूनही धरण प्रशासनाने व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून हे धरण पूर्णपणे अंधारात आहे. त्यामुळे धरणाला कोणत्याही क्षणी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी, सोनवडे, चरण, कोकरुड परिसरातील शेतकºयांनी केली आहे.धरणाला कोणताही धोका नाहीधरणाच्या धोक्याविषयी शाखाधिकारी प्रदीप कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, चांदोली धरण हे राज्यातील मातीचे दुसºया क्रमांकाचे धरण आहे. नाशिक येथील कार्यकारी अभियंत्यांकडून देखभाल, दुरुस्ती केली जाते. वर्षातून दोनवेळा त्याची पाहणी केली जाते. त्याचा अहवाल दिला जातो. धरण मजबूत असून धरणाला कोणताही धोका नाही.

टॅग्स :DamधरणSangliसांगली