शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

चांदोली धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार का? दोन वर्षापासून अधिकारीच फिरकले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:55 IST

चांदोली धरण महाराष्ट्रातील मातीचे दुसऱ्या क्रमांकाचे धरण असून ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. पण, धरण प्रशासनाचे अधिकारी गेल्या दोन वर्षांत इकडे फिरकलेच नाहीत. सहा महिन्यांपासून धरणाच्या भिंतीवरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून भिंतीवरील पथदिवे बंद : सीसीटीव्ही कॅमेरे बंद

गंगाराम पाटील ।वारणावती : चांदोली धरण महाराष्ट्रातील मातीचे दुसऱ्या क्रमांकाचे धरण असून ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. पण, धरण प्रशासनाचे अधिकारी गेल्या दोन वर्षांत इकडे फिरकलेच नाहीत. सहा महिन्यांपासून धरणाच्या भिंतीवरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे कोणत्याहीक्षणी धरणाला धोका पोहोचू शकतो. धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाची निर्मिती १९७६ मध्ये झाली. प्रथम १९८४ मध्ये अंशत: पाणीसाठा करण्यात आला, तर १९९२ पासून हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास सुरुवात झाली. याच धरणाच्या पायथ्याशी १६ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प आहे. सिंचनासह वीजनिर्मिती होते. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या ३६७.१७ चौरस किलोमीटरच्या पाणलोट क्षेत्रातून चांदोली धरणात पाण्याची आवक होत असल्याने हा परिसर पावसाचे आगर समजला जातो.

कोकणचे प्रवेशद्वार असणाºया या परिसरात पावसाळ्यात धुवाधार पाऊस, वारा व वारंवार होणाºया भूकंपामुळे हा परिसर संवेदनशील क्षेत्र आहे. पण धरण व पाणी याचे प्रशासन जलसंपदा विभागाकडे, तर वसाहत देखभाल व दुरुस्ती, वीज, पाणी हे कृष्णा खोरे विकास महामंडळ प्रशासनाकडे आहे. धरणाची सुरक्षा पोलीस यंत्रणेकडे व वीजनिर्मिती विद्युत पारेषण कंपनीकडे आहे. धरणाची अशी चार विभागांकडे विभागणी झाली आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रशासनाचा जबाबदार अधिकारी नाही. प्रत्येकजण आपापली जबाबदारी टाळताना दिसत आहे.गेल्या सहा महिन्यांपासून धरणाच्या भिंतीवरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.

वारंवार तक्रारी करूनही धरण प्रशासनाने व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून हे धरण पूर्णपणे अंधारात आहे. त्यामुळे धरणाला कोणत्याही क्षणी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी, सोनवडे, चरण, कोकरुड परिसरातील शेतकºयांनी केली आहे.धरणाला कोणताही धोका नाहीधरणाच्या धोक्याविषयी शाखाधिकारी प्रदीप कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, चांदोली धरण हे राज्यातील मातीचे दुसºया क्रमांकाचे धरण आहे. नाशिक येथील कार्यकारी अभियंत्यांकडून देखभाल, दुरुस्ती केली जाते. वर्षातून दोनवेळा त्याची पाहणी केली जाते. त्याचा अहवाल दिला जातो. धरण मजबूत असून धरणाला कोणताही धोका नाही.

टॅग्स :DamधरणSangliसांगली