शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

महाराष्ट्राचे नाव गुजरात करणार की काय?, उद्धव ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 11:44 IST

'विश्वजीत'साठी सांगली सोडली असती

सांगली : महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातला नेले, वित्तीय केंद्र गुजरातला नेले, तरीही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हा तर ट्रेलर होता. पिक्चर अभी बाकी है, असे म्हणत आहेत. म्हणजे महाराष्ट्राचे नाव आता गुजरात करणार की काय? असा सवाल उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी यांना केला. तसेच देशात इंडिया आघाडीला तीनशेहून अधिक जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.सांगलीतील नेमीनाथनगर येथील मैदानात गुरुवारी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. सभेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, उद्धवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, मिलिंद नार्वेकर, संजय पवार, अभिजित पाटील, प्रा. सुकुमार कांबळे, शकील फिरजादे, संजय विभुते, बजरंग पाटील आदी उपस्थित होते.उद्धव ठाकरे म्हणाले, कर्ज वाढलं, गॅस महाग झाला, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी निवडणूक रोखे घेऊन भाजपचे उत्पन्न वाढवले. खोटे बोलून देशातील १४० कोटी जनतेची मोदी यांनी फसवणूक केली आहे. दहा वर्षांत केलेल्या एकाही घोषणेची त्यांनी अंमलबजावणी केली नाही. ईडी, आयकर विभागाची भीती दाखवून भ्रष्ट नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना स्वच्छ करत आहेत. इंडिया आघाडीची ही लढाई देशातील हुकूमशाही भाजपाविरोधात आहे. देशातील जनताही पेटून उठल्याने ३०० पेक्षा जास्त जागा इंडिया आघाडी मिळणार आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

घटना बदलण्याचे भाजपला डोहाळेभाजपचे खासदारही जाहीर सभामध्ये आम्हाला देशाची घटना बदलण्यासाठीच ४०० जागा पाहिजेत. भाजपच्या नेत्यांना भारताची घटना बदलण्याचे डोहाळे लागले आहेत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

'विश्वजीत'साठी सांगली सोडली असतीपहिल्या दिवशी मला जर समजलं असतं की, सांगलीत काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम लढणार असते, तर मीसुद्धा ही जागा सोडली असती. इथल्या भविष्याच्या आड शिवसेना अजिबात येणार नाही, असे ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

देशाचे भविष्य १४० कोटी मतदारांच्या हातीदेशातील १४० कोटी जनतेमध्ये एकाच व्यक्तीला किती दिवस सत्तेवर ठेवणार आहे. देशाचे भविष्य हे नरेंद्र मोदी यांच्या हाती नाही, तर मतदारांच्या हाती आहे, असेही ठाकरे म्हणाले.

पूर, दुष्काळावेळी मोदी, शाह कुठे होते?महाराष्ट्रावर दुष्काळ, पुराचे संकट आले त्यावेळी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह कुठे होते? हे नेते महाराष्ट्रात कुठेच दिसले नाहीत. महाराष्ट्राला नेहमी वाईट नजरेने पाहणाऱ्यांना परत पाठविण्याची वेळ आली आहे, असा टोलाही ठाकरे यांनी मोदी, शाह यांना लगावला.

मी आजारी असताना पक्ष फोडलामी आजारी होतो. हातपायही हलविता येत नव्हते. अशावेळी माझी शिवसेना फोडली आणि आता तुम्ही माझं कौतुक करता, माझं कौतुक करू नका, करायचेच असेल तर शिवसेनेचे करा, असेही ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले.

भाजपात ये नाही तर तुरुंगाततोडा फोडा आणि राज्य करा, ही नीती वाढली आहे. भाजपमध्ये ये नाही तर तुरुंगात जा... काहीजण उघड उघड जात आहेत. काहीजण छुपी मदत करीत आहेत, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी