शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे नाव गुजरात करणार की काय?, उद्धव ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 11:44 IST

'विश्वजीत'साठी सांगली सोडली असती

सांगली : महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातला नेले, वित्तीय केंद्र गुजरातला नेले, तरीही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हा तर ट्रेलर होता. पिक्चर अभी बाकी है, असे म्हणत आहेत. म्हणजे महाराष्ट्राचे नाव आता गुजरात करणार की काय? असा सवाल उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी यांना केला. तसेच देशात इंडिया आघाडीला तीनशेहून अधिक जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.सांगलीतील नेमीनाथनगर येथील मैदानात गुरुवारी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. सभेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, उद्धवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, मिलिंद नार्वेकर, संजय पवार, अभिजित पाटील, प्रा. सुकुमार कांबळे, शकील फिरजादे, संजय विभुते, बजरंग पाटील आदी उपस्थित होते.उद्धव ठाकरे म्हणाले, कर्ज वाढलं, गॅस महाग झाला, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी निवडणूक रोखे घेऊन भाजपचे उत्पन्न वाढवले. खोटे बोलून देशातील १४० कोटी जनतेची मोदी यांनी फसवणूक केली आहे. दहा वर्षांत केलेल्या एकाही घोषणेची त्यांनी अंमलबजावणी केली नाही. ईडी, आयकर विभागाची भीती दाखवून भ्रष्ट नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना स्वच्छ करत आहेत. इंडिया आघाडीची ही लढाई देशातील हुकूमशाही भाजपाविरोधात आहे. देशातील जनताही पेटून उठल्याने ३०० पेक्षा जास्त जागा इंडिया आघाडी मिळणार आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

घटना बदलण्याचे भाजपला डोहाळेभाजपचे खासदारही जाहीर सभामध्ये आम्हाला देशाची घटना बदलण्यासाठीच ४०० जागा पाहिजेत. भाजपच्या नेत्यांना भारताची घटना बदलण्याचे डोहाळे लागले आहेत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

'विश्वजीत'साठी सांगली सोडली असतीपहिल्या दिवशी मला जर समजलं असतं की, सांगलीत काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम लढणार असते, तर मीसुद्धा ही जागा सोडली असती. इथल्या भविष्याच्या आड शिवसेना अजिबात येणार नाही, असे ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

देशाचे भविष्य १४० कोटी मतदारांच्या हातीदेशातील १४० कोटी जनतेमध्ये एकाच व्यक्तीला किती दिवस सत्तेवर ठेवणार आहे. देशाचे भविष्य हे नरेंद्र मोदी यांच्या हाती नाही, तर मतदारांच्या हाती आहे, असेही ठाकरे म्हणाले.

पूर, दुष्काळावेळी मोदी, शाह कुठे होते?महाराष्ट्रावर दुष्काळ, पुराचे संकट आले त्यावेळी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह कुठे होते? हे नेते महाराष्ट्रात कुठेच दिसले नाहीत. महाराष्ट्राला नेहमी वाईट नजरेने पाहणाऱ्यांना परत पाठविण्याची वेळ आली आहे, असा टोलाही ठाकरे यांनी मोदी, शाह यांना लगावला.

मी आजारी असताना पक्ष फोडलामी आजारी होतो. हातपायही हलविता येत नव्हते. अशावेळी माझी शिवसेना फोडली आणि आता तुम्ही माझं कौतुक करता, माझं कौतुक करू नका, करायचेच असेल तर शिवसेनेचे करा, असेही ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले.

भाजपात ये नाही तर तुरुंगाततोडा फोडा आणि राज्य करा, ही नीती वाढली आहे. भाजपमध्ये ये नाही तर तुरुंगात जा... काहीजण उघड उघड जात आहेत. काहीजण छुपी मदत करीत आहेत, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी