शहराच्या विकास कामांचा बॅकलॉग पूर्ण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:24 IST2020-12-08T04:24:36+5:302020-12-08T04:24:36+5:30
इस्लामपूर : नगरपालिकेत कोणाची सत्ता आहे, याचा विचार करणार नाही. या शहराने मला सातत्याने पाठबळ दिले आहे. शहरात गेल्या ...

शहराच्या विकास कामांचा बॅकलॉग पूर्ण करणार
इस्लामपूर : नगरपालिकेत कोणाची सत्ता आहे, याचा विचार करणार नाही. या शहराने मला सातत्याने पाठबळ दिले आहे. शहरात गेल्या चार-पाच वर्षात निर्माण झालेला विकास कामांचा बॅकलॉग ताकदीने पूर्ण करणार असल्याचा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील प्रभाग बैठकांमध्ये व्यक्त केला.
जयंत पाटील यांनी शिवनगर, श्री अण्णासाहेब डांगे चौक व शिवाजी चौकात प्रभाग बैठका घेऊन नागरिकांचे प्रश्न समजून घेतले. या बैठकांमध्ये नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
डांगे चौकात गेल्या काही महिन्यांपासून दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचे नगरसेवक विश्वनाथ डांगे यांच्यासह नागरिकांनी पाटील यांच्या निदर्शनास आणले. यावर मंत्री पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलताना, शहरासाठी पिण्याच्या पाण्याची किती चांगली योजना केली होती, मात्र आपण तिची वाट लावली, अशी संतप्त भावना व्यक्त केली.
पाटील म्हणाले, भुयारी गटारी कामासाठी खुदाई करताना व पाईप मुजविताना खबरदारी न घेतल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्रश्न तयार झाला आहे. शहरातील नवीन पाईपचा प्रस्ताव जीवन प्राधिकरणकडे आहे. त्यास राज्य शासनाकडून तातडीने मंजुरी देऊ.
यावेळी अॅड. चिमण डांगे, अरुण कांबळे, शहाजीबापू पाटील, खंडेराव जाधव, तहसीलदार रवींद्र सबनीस, मुख्याधिकारी अरविंद माळी, भगवान पाटील, विश्वनाथ डांगे, बशीर मुल्ला, सविता आवटे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी- ०७१२२०२०-आयएसएलएम-इस्लामपूर जयंत पाटील न्यूज
फोटो ओळ :
इस्लामपूर येथील प्रभाग बैठकांमध्ये पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी प्रतीक पाटील, अॅड. चिमण डांगे, शहाजीबापू पाटील, रवींद्र सबनीस, अरविंद माळी उपस्थित होते.