शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

पत्नी रुग्णालयात, अन् घरातून शेतमजुराची मुले बेपत्ता; सांगलीतील अमृतवाडीत उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 13:28 IST

जत पोलिस व स्थानिक नागरिकांकडून शोध सुरु

जत : अमृतवाडी (ता. जत) येथे गुरुवारी घरातून शेतमजुरीची लहान मुलगी व मुलगा बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. सुलोचना आनंद गवळी (वय ४) व इंद्रजित आनंद गवळी (३) अशी बेपत्ता मुलांची नावे आहेत. जत पोलिस व स्थानिक नागरिकांनी गुरुवार व शुक्रवारी त्यांचा शोध घेऊनही ती सापडली नाहीत. याबाबत आनंदा गवळी (वय ३५, मूळ गाव सुरगाना, जि. नाशिक, सध्या रा. अमृतवाडी) यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.जत येथील द्राक्ष बागायतदार दीपक हत्ती यांच्या शेतात आनंद गवळी हे तीन वर्षांपासून मजूर म्हणून काम करत आहेत. ते या ठिकाणी पत्नी व दोन मुलांसह राहतात. गुरुवारी आनंद यांची पत्नी आजारी असल्याने तिला रुग्णालयात दाखल केले होते. यामुळे सुलोचना व इंद्रजित ही त्यांची दोन मुले घरीच होती. गुरुवारी सायंकाळी आनंद गवळी हे घरी आले. त्यावेळी मुले घरात दिसली नाहीत. त्यांची परिसरात त्यांचा शोध घेतला; पण ती सापडली नाहीत; यामुळे गवळी यांनी जत पोलिस ठाण्यात याबाबत गुरुवारी रात्रीच फिर्याद दिली होती.शुक्रवारी सकाळी पोलिसांनी माहिती घेतली. परिसरात शोध सुरू केला. संशय आल्याने घरानजीक असणाऱ्या विहीर व शेततळ्यातील पाण्याचाही उपसा केला; पण हाती काहीच लागले नाही. शुक्रवारी संपूर्ण दिवसभर पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे व पोलिस पथक अमृतवाडी गावात तळ ठोकून होते.

टॅग्स :SangliसांगलीMissingबेपत्ता होणंCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस