शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सीमावासीयांचा टाहो: सांगलीतील जतमधील लोकांची कर्नाटकात जाण्याची मानसिकता का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 12:42 IST

तालुका विभाजनाच्या प्रश्नाचे तीस वर्षांपासून भिजत घोंगडे पडले आहे.

गजानन पाटीलदरीबडची : जत तालुक्याच्या पूर्व भागात पाण्याच्या प्रश्नांबरोबर विभाजनाचा प्रश्न, बेरोजगार, शिक्षण, रस्ता, आरोग्य, शासकीय विभागातील रिक्त जागांचा प्रश्न गंभीर आहे. अनेक वर्षांपासून रिक्त जागाच भरला जात नाही. विकास कामे होत नाहीत. अनुशेष भरून जात नसल्याने सीमावासीय लोकांमध्ये सरकार बद्दल असंतोष निर्माण झाला आहे.जिल्ह्यात जत तालुका विस्ताराने सर्वात मोठा. तालुक्यात १२३ गावे व २७६ वाड्या-वस्त्या आहेत. दोन लाख २४ हजार ५३८ चौरस किलोमीटर आहे. हिंगोली जिल्ह्याइतके या तालुक्याचे क्षेत्रफळ आहे. पंचायत समिती, आरोग विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग, पोलीस ठाणे यामधील अनेक पदे रिक्त आहेत. बेरोजगारी, उच्च शिक्षण, औद्योगिकीकरण, दळणवळण यापासून मागे आहोत.तालुका विभाजनाच्या प्रश्नाचे तीस वर्षांपासून भिजत घोंगडे पडले आहे. तालुका विस्ताराने मोठा असल्यामुळे विकासकामे रखडली आहेत. तालुका सर्वात मोठा असल्याने येणारा निधी कमी आहे. पायाभूत सुविधांचा अभाव आहे. ३८२ किलोमीटर लांबीचे प्रमुख १३ जिल्हा मार्ग आहेत. इतर जिल्हा मार्गाची लांबी ५६८ किलोमीटर आहे. मात्र रस्त्याची अवस्था बिकट आहे.    तालुक्यात कृषी, इंजिनिअरिंग, वैद्यकीय कॉलेज नाहीत. मराठी, कन्नड व ऊर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. २७८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दोन ग्रामीण रुग्णालय, ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने आरोग्य सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत. पशुवैद्यकीय विभागाचीही पदे रिक्त आहेत.

मराठी शाळांचे काय झाले ?तालुक्यातील सीमावर्ती भागात राज्य शासनाने २०१२ मध्ये माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु गेल्या दहा वर्षांपासून शाळेचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे.कर्नाटकात जाण्याचे मानसिकता काय आहे ?

  • शेतीपंपासाठी मोफत वीज.
  • ६० वर्षावरील व्यक्तीला प्रतिमहिना पेन्शन.
  • शेतकऱ्यांना रब्बी आणि खरीप हंगामातील पिकांची
  • पेरणी करण्यासाठी सवलतीच्या दरात बी बियाणे व रासायनिक खते उपलब्ध.
  • शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळते.
  • ५ रुपये किलो दराने दुकानात ३० किलो तांदूळ
  • सीमा लगत भागातील विद्यार्थ्यांना गडीनाडू प्रमाणपत्र आधारे नोकरी इंजिनिअरिंग वैद्यकीय प्रवेश दिला जातो.
  • तीन लाखापर्यंत बिगर व्याज कर्ज. 

सीमा भागातील प्रश्नांवर कोणतेही सरकारने गांभीर्याने घेतले नाही. कर्नाटकात जनतेला सेवा सुविधा, मिळत असल्याने कर्नाटकाचे आकर्षण आहे. कर्नाटकात जाण्याची इच्छा नाही. शासनाने सीमा भागातील तालुक्यांसाठी खास बाब म्हणून धोरणात्मक निर्णय घेऊन मूलभूत सेवा, बेरोजगार, उद्योग, शेतकऱ्यांसाठी  प्रोत्साहन अनुदान द्यावे. शाश्वत विकासासाठी तातडीने कृती कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. - विक्रम ढोणे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र