शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दोन महिन्यांवर निवडणुका आल्या असताना राजीनाम्याची भाषा का?; अनिल बाबर यांचा संजय पाटीलांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 13:00 IST

विटा : कृष्णा-कोयनेचे पाणी पाण्याच्या मार्गाने जाईल. पण, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना जरा भान ठेवा, नाहीतर आम्हालाही याबाबत गांभीर्याने घ्यावे लागेल, ...

विटा : कृष्णा-कोयनेचे पाणी पाण्याच्या मार्गाने जाईल. पण, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना जरा भान ठेवा, नाहीतर आम्हालाही याबाबत गांभीर्याने घ्यावे लागेल, असा इशारा देऊन पाण्याचा सर्व प्रश्न सुटला असताना आणि निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर आल्या असताना आपल्याकडून राजीनाम्याची भाषा का ? असा सवाल करीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी खासदार संजय पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.शनिवारी खासदार संजय पाटील यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याने कोयनेचे पाणी सोडले जात नाही. आमदार बाबर मुख्यमंत्र्यांना फोन करतात आणि मग पाणी सुटते, हा काय प्रकार आहे ? असे प्रश्न उपस्थित करीत पाण्यासाठी प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देऊ, असा इशारा दिला होता. त्यानंतर रविवारी अनिल बाबर यांनी विट्यात पत्रकार परिषद घेऊन पाटील यांच्यावर निशाणा साधला.बाबर म्हणाले, एकत्र सत्तेत असताना मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराबाबत बोलताना भान ठेवा. जपून बोला. अन्यथा आम्हाला गंभीर दखल घ्यावी लागेल. पाणी पाण्याच्या मार्गाने जाईल. तुम्हाला राजीनामा द्यायचा असेल, पाण्याचे कारण कशाला ? राजीनामा देण्याचे कारण काही वेगळे असेल तर आवश्य राजीनामा द्या. पण, अवघ्या दोन महिन्यांवर निवडणुका झाल्या असताना आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असताना राजीनामा देण्याची भाषा न समजण्याइतपत जनता दूधखुळी नाही. आम्ही कोणत्याही परिणामांची पर्वा न करता तुम्हाला सत्तेत येण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळे सरकार चालविण्याची जबाबदारी सर्वांची आहे.गेल्या १० ते १२ दिवसांपासून कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्यानंतर कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत होते. जनतेसाठी महत्त्वाचा प्रश्न असल्याने सर्वांचेच प्रयत्न सुरू होते. या दरम्यान, खासदार संजय पाटील यांचा मला फोन आला होता. तुम्ही मुख्यमंत्री शिंदे आणि साताऱ्याचे पालकमंत्री देसाई यांच्याशी बोला. आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतो, असे ते म्हणाले.यानंतर आम्ही आमच्या पातळीवर प्रयत्न करून मुख्यमंत्री शिंदे आणि देसाई यांच्याशी बोलून प्रश्न मार्गी लावला. यानंतर पाणी सोडण्यात आले. आता सगळं झाल्यावर संजय पाटील टीका करीत आहेत. पाण्याचा त्यांचा अभ्यास आहे. त्यांची बोलण्याची पद्धत तशी आहे, याची आम्हाला कल्पना आहे. पण, मुख्यमंत्री आणि सरकारमधील मंत्र्यांवर बोलताना भान ठेवले पाहिजे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना