शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

चीनचा निकृष्ट बेदाणा कर चुकवून येत असताना शासन गप्प का?, जयंत पाटील यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 19:16 IST

सरकारची ही उदासीन भूमिका द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर उठली आहे

तासगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी चीनमधून होणाऱ्या बेकायदेशीर बेदाणा आयातीवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. कर चुकवून आयात होणाऱ्या निकृष्ट बेदाण्यांमुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वारंवार या प्रश्नाकडे लक्ष वेधूनही सरकार कोणताच निर्णय घेत नसल्याने, सरकार या विषयावर गंभीर आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.आमदार पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, यंदाच्या हंगामात हवामानातील बदलांमुळे द्राक्ष उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आधीच बेदाणा उत्पादन कमी झाले आहे. अशातच, चीनमधून मोठ्या प्रमाणात कर चुकवून निकृष्ट दर्जाच्या बेदाण्याची आयात होत आहे. या दुहेरी संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, परकीय गंगाजळीवरही परिणाम होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला मिळणाऱ्या अपेक्षित दराचे गणित पूर्णपणे बिघडले आहे.पाटील यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, सांगली, नाशिक, जळगाव, सातारा अशा अनेक भागांतील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी पिकवलेल्या बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करावा, अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही, आणि दुसरीकडे सरकार चीनमधून बेदाणा आयात करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. सरकारची ही उदासीन भूमिका द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर उठली आहे.पाटील यांनी सरकारच्या या भूमिकेचा निषेध करत, तात्काळ बेकायदेशीर आयात झालेल्या बेदाण्याची विक्री थांबवावी आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी केली आहे.