शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
2
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
3
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
4
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
5
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
6
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
7
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
8
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
9
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
10
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
11
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
12
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
13
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
14
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
15
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
16
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
17
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
18
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
19
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
20
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...

त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 20:11 IST

पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं आहे.

Beant Singh Killing Case: पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांची ३१ ऑगस्ट १९९५ रोजी चंदीगड येथील सचिवालयाच्या बाहेर बॉम्बस्फोटात हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी बलवंत सिंग राजोआना याला दोषी ठरवण्यात आले. तो त्यावेळी पंजाब पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून काम करत होता. या बॉम्बस्फोटात बेअंत सिंग यांच्यासह एकूण १७ लोकांचा मृत्यू झाला होता. राजोआनाला २००७ मध्ये विशेष सीबीआय कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

बेअंत सिंग यांच्या हत्येतील आरोपींबाबत सुप्रीम कोर्टाने बुधवारी केंद्र सरकारला फटकारले. केंद्राने याला गंभीर गुन्हा म्हटले होते, तरीही बलवंत सिंग राजोआनाला आतापर्यंत फाशी का देण्यात आली नाही? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला. १९९५ मध्ये बेअंत सिंग यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेला बलवंत सिंग राजोआना गेल्या २९ वर्षांपासून तुरुंगात आहे. ३१ ऑगस्ट १९९५ रोजी चंदीगडमधील नागरी सचिवालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या स्फोटात बेअंत सिंग आणि इतर १६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, जुलै २००७ मध्ये विशेष न्यायालयाने राजोआना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

फाशीच्या शिक्षेविरुद्ध राजोआनाने स्वतः कोणतीही दया याचिका दाखल केली नाही, कारण त्याने आपल्या कृत्याचा पश्चात्ताप नसल्याचे म्हटले होते. तरीही, २०१२ मध्ये शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने त्याच्या वतीने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली. गेल्या अनेक वर्षांपासून राजोआना याची दया याचिका प्रलंबित आहे, आणि याच कारणामुळे हे प्रकरण वारंवार सुप्रीम कोर्टात येत आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी केंद्र सरकार आणि राष्ट्रपती कार्यालयाला निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

बुधवारी सु्प्रीम कोर्टात राजोआनाच्या दया याचिकेवर निर्णय घेण्यास विलंब झाल्याच्या कारणावरून त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल केएम नटराज यांनी याचिकेला विरोध केला आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एनव्ही अंजारिया यांच्या खंडपीठाला सांगितले की हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. त्यावर खंडपीठाने नटराज यांना "तुम्ही त्याला अद्याप फाशी का दिली नाही? यासाठी कोण जबाबदार आहे? आम्ही फाशीला स्थगितीसुद्धा दिलेली नाही," असं विचारलं. यावरनटराज यांनी शक्य तितक्या लवकर उत्तर देण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे, आणि सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला यावर लवकर तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, बेअंत सिंग हत्या प्रकरणाचा दोषी असलेल्या बलवंत सिंग राजोआनाच्या शिक्षेवर अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे. सध्या, खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी १५ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली आहे आणि केंद्राच्या विनंतीवरून हा खटला पुन्हा पुढे ढकलला जाणार नाही, असे म्हटले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPunjabपंजाबCentral Governmentकेंद्र सरकार