शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

सोशल मीडियाच्या अतिरेकातूनच उमदीत खून, भरकटलेल्या तरुणांना आवरणार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 18:04 IST

मोबाइलच्या वापराबरोबर सोशल मीडियात तरुणाई गुरफटली. यातून सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेतून वादही उफाळू लागला. यात भरीस भर म्हणून शहराप्रमाणे गुंडगिरी, टोळीयुद्धासारखे लोण ग्रामीण भागातही पोहोचले आहे

गजानन पाटीलसंख : शहराबरोबरच ग्रामीण भागातही गुंडांच्या टोळ्यांना राजकीय पाठबळ, सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, गावातील जयंती, उत्सव, कार्यक्रमात मानापमान यामुळे आजची तरुणाई भरकटल्याचे जत तालुक्यातील उमदी येथील दुहेरी खुनाने दाखवून दिले आहे. यात दोन उमद्या तरुणांना जीव गमवावा लागला.

जत पूर्व भागातील उमदी हे राजकीय व सामाजिक दृष्टीने संवेदनशील गाव आहे. ग्रामीण भागातील सर्वांत मोठे गाव आहे. येथे पोलीस ठाणेही आहे. तालुक्यातील द्राक्ष उत्पादनात हे गाव अग्रेसर आहे. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बेदाण्याची निर्मिती केली जाते.

गावातून अहमदनगर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. त्यामुळे आर्थिक व सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. लोकांच्या हातात पैसे आले आणि चंगळवादी संस्कृती वाढली. मोबाइलच्या वापराबरोबर सोशल मीडियात तरुणाई गुरफटली. यातून सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेतून वादही उफाळू लागला. यात भरीस भर म्हणून शहराप्रमाणे गुंडगिरी, टोळीयुद्धासारखे लोण ग्रामीण भागातही पोहोचले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून खुनासारख्या घटना घडू लागल्या. उमदीत मंगळवारी घडलेली घटना ही याचेच उदाहरण आहे.

मृत संतोष राजकुमार माळी हा हुशार विद्यार्थी होता. उदगीर येथे बीएस्सी ॲग्रीच्या तिसऱ्या वर्षात तो शिक्षण घेत होता. गुणवत्तेवर त्याने प्रवेश मिळविला होता. स्पर्धा परीक्षेचीही तयारी करीत होता. त्याची आई बसस्थानकावर हॉटेल चालविते, तर मदगोंडा बगली हा एकुलता एक मुलगा. आई भाजीपाला विक्री करते.

शांततेसाठी प्रयत्न व्हावेत

गावामध्ये वादविवाद, भांडणतंटे सामंजस्याने मिटवून गावपुढाऱ्यांनी शांतता राखण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. राजकारण न करता एकोपा राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडिया