शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाच्या अतिरेकातूनच उमदीत खून, भरकटलेल्या तरुणांना आवरणार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 18:04 IST

मोबाइलच्या वापराबरोबर सोशल मीडियात तरुणाई गुरफटली. यातून सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेतून वादही उफाळू लागला. यात भरीस भर म्हणून शहराप्रमाणे गुंडगिरी, टोळीयुद्धासारखे लोण ग्रामीण भागातही पोहोचले आहे

गजानन पाटीलसंख : शहराबरोबरच ग्रामीण भागातही गुंडांच्या टोळ्यांना राजकीय पाठबळ, सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, गावातील जयंती, उत्सव, कार्यक्रमात मानापमान यामुळे आजची तरुणाई भरकटल्याचे जत तालुक्यातील उमदी येथील दुहेरी खुनाने दाखवून दिले आहे. यात दोन उमद्या तरुणांना जीव गमवावा लागला.

जत पूर्व भागातील उमदी हे राजकीय व सामाजिक दृष्टीने संवेदनशील गाव आहे. ग्रामीण भागातील सर्वांत मोठे गाव आहे. येथे पोलीस ठाणेही आहे. तालुक्यातील द्राक्ष उत्पादनात हे गाव अग्रेसर आहे. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बेदाण्याची निर्मिती केली जाते.

गावातून अहमदनगर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. त्यामुळे आर्थिक व सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. लोकांच्या हातात पैसे आले आणि चंगळवादी संस्कृती वाढली. मोबाइलच्या वापराबरोबर सोशल मीडियात तरुणाई गुरफटली. यातून सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेतून वादही उफाळू लागला. यात भरीस भर म्हणून शहराप्रमाणे गुंडगिरी, टोळीयुद्धासारखे लोण ग्रामीण भागातही पोहोचले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून खुनासारख्या घटना घडू लागल्या. उमदीत मंगळवारी घडलेली घटना ही याचेच उदाहरण आहे.

मृत संतोष राजकुमार माळी हा हुशार विद्यार्थी होता. उदगीर येथे बीएस्सी ॲग्रीच्या तिसऱ्या वर्षात तो शिक्षण घेत होता. गुणवत्तेवर त्याने प्रवेश मिळविला होता. स्पर्धा परीक्षेचीही तयारी करीत होता. त्याची आई बसस्थानकावर हॉटेल चालविते, तर मदगोंडा बगली हा एकुलता एक मुलगा. आई भाजीपाला विक्री करते.

शांततेसाठी प्रयत्न व्हावेत

गावामध्ये वादविवाद, भांडणतंटे सामंजस्याने मिटवून गावपुढाऱ्यांनी शांतता राखण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. राजकारण न करता एकोपा राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडिया