शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Sangli: म्हैसाळ योजनेच्या 'ओव्हर फ्लो'ला जबाबदार कोण?, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 15:57 IST

सुशांत घोरपडे म्हैसाळ : म्हैसाळ योजनेचा शुक्रवारी (दि.29) सायंकाळी टप्पा क्रमांक पाच ओव्हर फ्लो झाला. शनिवारी (दि.23) दुपारी टप्पा ...

सुशांत घोरपडेम्हैसाळ : म्हैसाळ योजनेचा शुक्रवारी (दि.29) सायंकाळी टप्पा क्रमांक पाच ओव्हर फ्लो झाला. शनिवारी (दि.23) दुपारी टप्पा क्रमांक चार ओव्हर फ्लो झाल्याने कोबी, ऊस, भेंडी, कोंथिबीर पिकाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या वारंवार होणाऱ्या ओव्हर फ्लो'ला जबाबदार तरी कोण? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जाऊ लागला आहे.म्हैसाळ योजना ही दुष्काळ भागात संजीवनी देणारी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून दुष्काळ भागाला पाणी सोडले जाते. या वर्षी पाणी टंचाई असल्याने ऐन पावसाळ्यात म्हैसाळ योजना सुरू करण्यात आली. एकीकडे नदीपात्रात पाण्याची टंचाई असताना अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजना अभावी ओव्हर फ्लो होऊन लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या ओव्हर फ्लोमुळे आरग येथील शेतकरी गोपाळ कोरे यांची अर्धा एकर कोबी पाणी साचल्याने उध्वस्त झाला. दत्ता कोरे यांच्या एक एकर ऊसात पाणी साचल्याने उस कुजला आहे. ओंमकार शिंदे यांची अर्धा एकर भेंडी व मच्छिंद्र पाटील यांची एक एकर कोंथिबीर वाहून गेली. वारंवार होणाऱ्या या ओव्हर फ्लो मुळे जवळपास दोनशे एकर शेतीला याचा त्रास होत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. 

म्हैसाळ योजना आठवड्यातून एखादा तरी ओव्हर फ्लो होते. यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. उस पिकत नाही. गेली वीस वर्षे मी या त्रासाला सामोरे जात आहे. यावर योग्य त्या उपाय योजना कराव्यात अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू - श्रीधर कोरे, शेतकरी, आरगपंप हाऊसमधील विद्युत प्रवाह तीन ते चार वेळा ट्रीप झाले. त्यामुळे पंप बंद होऊन ओव्हर फ्लो झाला. या बाबात वरीष्ठांना कळविले आहे. लवकरच उपाययोजना करू - रवि माळी, उप अभियंता -टप्पा क्रमांक चार

यांत्रिक विभाग करतो काय?पंप नियंत्रित करण्याचे काम यांत्रिक विभागाकडे येते. वारंवार ओव्हर फ्लो होते. मग यांत्रिक विभाग नेमके काय करतो?अधिकारी काय करतात? यावर कोणाचे अंकुश आहे की नाही असे प्रश्न समोर येत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी