शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

तासगावमध्ये आबा गटाचे सूत्रधार कोण?

By admin | Updated: September 22, 2015 00:09 IST

तीनखांबी नेतृत्व : तरीही कार्यकर्ते डळमळीत

'दत्ता पाटील -- तासगाव--माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आबा यांच्या पश्चात सुमनताई पाटील यांना विधानसभेची संधी मिळाली. तरीही आबांच्या पश्चात आबा गटाची धुरा कोण वाहणार, याची कुजबूज आबा समर्थकांत सुरू होती. गेल्या काही महिन्यांत तासगाव-कवठेमहांकाळमध्ये घडणाऱ्या राजकीय घडामोडींनंतर प्रश्न विचारणारा आवाज मोठा होत आहे. आबांच्या पश्चात आमदार सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, स्मिता पाटील यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आहे. तरीही कार्यकर्त्यांची भलीमोठी फौज असूनदेखील आबा गट डळमळीत होत आहे. याचे आत्मपरीक्षण नेते करोत अथवा न करोत, पण सामान्य कार्यकर्त्यांतून मात्र, आबा गटाचे नेमके सूत्रधार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.एकेकाळी जिल्ह्यासह राज्यात मुलुखमैदानी तोफ म्हणून माजी गृहमंत्री आर. आर. पाटील परिचित होते. त्यांनी गटा-तटाचे राजकारण केले नाही. मात्र अनेक गटा-तटांना सामावून घेतले. अशा आबांचा मतदारसंघासह जिल्ह्यातही एक गट निर्माण झाला. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघावर तर त्यांचे एकहाती प्रभुत्व होते. मात्र त्यांच्या पश्चात वर्षभरातच आबा गटातील कार्यकर्ते डळमळीत होताना दिसत आहेत. यानिमित्ताने आबा गटाचा सूत्रधार कोण? हा दबक्या आवाजातील प्रश्न आता मोठ्या आवाजात विचारला जात आहे. तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत आबा गटाच्या शिलेदारांनी काका गटाचा धुव्वा उडविला. त्यामुळे आबांच्या पश्चातही बालेकिल्ला मजबूत असल्याचे कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. मात्र या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना असले तरी, आबांनी यापूर्वी केलेल्या ग्रामपंचायत, सोसायट्यांतील कामाची पुण्याईही कामी आली होती, हे नाकारून चालणार नाही. मात्र आबांची सहानुभूती फार काळ टिकणार नसल्याची चुणूक संजयकाकांनी नगरपालिकेत दाखवून दिली. इतकी वर्षे आबांच्या सत्तेची फळे चाखलेल्या त्यांच्या समर्थकांनी आता काकांचा आसरा घेण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीकडे आबाही नाहीत आणि सत्ताही नाही. अशी अवस्था आहेच. पण त्यापेक्षाही आता आबांची जागा घेणारेही कोणी नाही, अशी भावनाही कार्यकर्त्यांच्या मनात घर करून आहे. आबांच्या पश्चात आमदार सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील आणि स्मिता पाटील अशा तीनखांबी नेतृत्वाकडून डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न होत आहे. तरीही कार्यकर्ता डळमळीत होताना दिसून येत आहे. आज तासगाव शहरात झाले, उद्या ग्रामीण भागात का होणार नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. अर्थात शहरातील आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील राजकीय परिस्थिती भिन्न आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्ता सहजासहजी स्वाभिमान आणि निष्ठा, दुसऱ्या गटाकडे गहाण ठेवत नाही. त्यामुळे नाराजी असूनदेखील काही पदाधिकाऱ्यांनी आबा गट सोडलेला नाही. आबा गटाचे नेतृत्व करणाऱ्यांना, आबांची पुण्याई फार काळ तारणार नाही, याची जाणीव ठेवूनच राजकीय वाटचाल करावी लागणार आहे. आबा गटाचा प्रत्येक शिलेदार आपापला गट सांभाळण्याच्या मानसिकतेत आहे. मात्र सामान्य कार्यकर्त्यांची कामे मार्गी लागल्याशिवाय कार्यकर्ता सोबत करणार नाही, याची जाणीव ठेवून आक्रमक नेतृत्व तयार झाले तरच राष्ट्रवादीचा उर्वरित गड अभेद्य राहणार आहे, मात्र हे करण्यासाठी नेतृत्व कोण आणि कसे करणार, हे कृतीतून दाखवून द्यायला हवे.का पडला प्रश्न? आबांचे नेतृत्व एकखांबी होते. त्यांच्या कारकीर्दीत कार्यकर्त्यांची कामे चुटकीसरशी मार्गी लागायची. मात्र त्यांच्या पश्चात आबांच्या घरातच नेतृत्वाचा त्रिकोण तयार झाला आहे. या त्रिकोणातच आबा गटातील कार्यकर्त्यांची विभागणी झाली आहे. मुळातच आबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचेच गावागावात गटतट आहेत. आता हे गट सोयीनुसार सुमनताई, सुरेश पाटील, स्मिता पाटील यांच्यासोबत आहेत. मात्र सामान्य कार्यकर्त्याला आबांच्या पश्चात अडचण सोडवण्यासाठी नेमके कोणाकडे जाचये? असा प्रश्न पडला आहे.