शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

सत्ता असो वा नसो, कामे करायची दृष्टी पाहिजे - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 03:28 IST

पक्ष सोडणाऱ्यांना फटकारले; राजारामबापू पाटील जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ

इस्लामपूर (जि. सांगली) : काही लोक सोडून गेले, त्याची चिंता नाही. कामे होत नाहीत, अशा सबबी काहींनी सांगितल्या. मात्र सत्ता असो वा नसो, कामे करायची दृष्टी पाहिजे. सत्ता नसली तरी कामाशी बांधिलकी असेल, तर लोकांचा पाठिंबा मिळतोच, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना फटकारले. राजारामबापूंच्या विचाराने पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्यासाठी सर्वांनी संघटित व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

येथील राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विद्यार्थी नेते कन्हैया कुमार, माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे, राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आदींच्या उपस्थितीत झाला. पवार म्हणाले की, राजारामबापूंनी उद्योग आणि वीजमंत्री असताना ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा पाया भक्कम केला. स्थानिकांना रोजगार देण्याचे काम केले. जनता पक्षात गेल्यावर त्यांनी प्रभावी विरोधक म्हणून काम करुन दाखवले. आज देशात आणि राज्यात सत्तेचा गैरवापर होत आहे. जातीपातीवरुन माणसांवरच हल्ले होत आहेत. संकट बाजूला करुन देशाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, बापूंच्या रक्तात काँगे्रस होती. त्यानंतर ते जनता पक्षात गेले तरी, आम्ही सर्वांनी मिळून समाजवादी विचारधारा भक्कम करण्याचे काम केले. कन्हैया कुमार म्हणाले की, इंग्रजांना पळवून लावताना जितके कष्ट पडले, त्यापेक्षा अधिक प्रयत्न आणि कष्ट भाजपला पळवून लावताना करावे लागणार आहेत. बापूंच्या विचारांचे बोट धरुन बलशाली हिंदुस्थानची उभारणी करावी लागेल. जयंत पाटील म्हणाले, बापूंनी शून्यातून कार्यकर्ते निर्माण केले. राजकारणात चांगले-वाईट दिवस येतात. मात्र संकटात साथदेतो, तो खरा कार्यकर्ता, ही बापूंची शिकवण आम्ही कायम ठेवली आहे.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवार