शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
5
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
6
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
7
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
8
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
9
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
10
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
11
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
12
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
13
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
14
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
15
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
16
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
17
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
18
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
19
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
20
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले

सत्ता असो वा नसो, कामे करायची दृष्टी पाहिजे - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 03:28 IST

पक्ष सोडणाऱ्यांना फटकारले; राजारामबापू पाटील जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ

इस्लामपूर (जि. सांगली) : काही लोक सोडून गेले, त्याची चिंता नाही. कामे होत नाहीत, अशा सबबी काहींनी सांगितल्या. मात्र सत्ता असो वा नसो, कामे करायची दृष्टी पाहिजे. सत्ता नसली तरी कामाशी बांधिलकी असेल, तर लोकांचा पाठिंबा मिळतोच, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना फटकारले. राजारामबापूंच्या विचाराने पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्यासाठी सर्वांनी संघटित व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

येथील राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विद्यार्थी नेते कन्हैया कुमार, माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे, राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आदींच्या उपस्थितीत झाला. पवार म्हणाले की, राजारामबापूंनी उद्योग आणि वीजमंत्री असताना ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा पाया भक्कम केला. स्थानिकांना रोजगार देण्याचे काम केले. जनता पक्षात गेल्यावर त्यांनी प्रभावी विरोधक म्हणून काम करुन दाखवले. आज देशात आणि राज्यात सत्तेचा गैरवापर होत आहे. जातीपातीवरुन माणसांवरच हल्ले होत आहेत. संकट बाजूला करुन देशाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, बापूंच्या रक्तात काँगे्रस होती. त्यानंतर ते जनता पक्षात गेले तरी, आम्ही सर्वांनी मिळून समाजवादी विचारधारा भक्कम करण्याचे काम केले. कन्हैया कुमार म्हणाले की, इंग्रजांना पळवून लावताना जितके कष्ट पडले, त्यापेक्षा अधिक प्रयत्न आणि कष्ट भाजपला पळवून लावताना करावे लागणार आहेत. बापूंच्या विचारांचे बोट धरुन बलशाली हिंदुस्थानची उभारणी करावी लागेल. जयंत पाटील म्हणाले, बापूंनी शून्यातून कार्यकर्ते निर्माण केले. राजकारणात चांगले-वाईट दिवस येतात. मात्र संकटात साथदेतो, तो खरा कार्यकर्ता, ही बापूंची शिकवण आम्ही कायम ठेवली आहे.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवार