शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

ऊस दर: सांगलीचे साखर कारखानदार तोडगा कधी काढणार?, निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 17:05 IST

माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सर्व कारखानदारांची बैठक बोलविली

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ज्या कारखान्याची एफआरपी तीन हजारपेक्षा जास्त आहे त्यांनी प्रति टन १०० रुपये द्यावेत आणि उर्वरित कारखान्यांनी प्रति टन ५० रुपये जादा शेतकऱ्यांना द्यावेत, असा तोडगा निघाला आहे. या तोडग्याची जिल्ह्यातील कारखानदार अंमलबजावणी करणार की वेगळा काय निर्णय होणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.गतवर्षी गाळपास गेलेल्या उसाला प्रति टन ४०० रुपये मिळावेत. तसेच चालू गळीत हंगामासाठी येणाऱ्या उसाला प्रति टन तीन हजार ५०० रुपये दर मिळाला पाहिजे. या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन चालू केले होते. या आंदोलनानंतरही कारखानदारांनी दराची कोंडी फोडली नसल्यामुळे गुरुवारी पुणे ते बेंगलोर महामार्गावर कोल्हापुरातील शिरोळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते.या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत ज्या कारखान्यांनी प्रति टन तीन हजार रुपयांपेक्षा कमी दर दिला आहे. त्या कारखान्यांनी प्रति टन १०० रुपये द्यावेत. तसेच उर्वरित कारखानदारांनी प्रति टन ५० रुपये द्यावेत, असा तोडगा निघाला आहे. या निर्णयानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील कारखानदार तोडगा काढणार की नाही, असा शेतकऱ्यांनी सवाल उपस्थित केला आहे.कारखानदारांनी तोडगा काढला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कारखानदारांच्या भूमिकेकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे.

२६ नोव्हेंबरला बैठकसांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी दि. २६ नोव्हेंबर रोजी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सर्व कारखानदारांची बैठक बोलविली आहे. या बैठकीस शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाही बोलविले आहे, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. या बैठकीत तोडगा निघणार की त्यापूर्वीच कारखानदार दराची कोंडी फोडणार, अशीही शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखाने