शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

माझ्यासारख्याचे भाजपमध्ये काय काम?, जयंत पाटलांनी सवाल करीत चर्चांना दिला पूर्णविराम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:26 IST

जेरीस आणून पक्षप्रवेशाचा खेळ

सांगली : भाजप आता देशात नव्हे तर जगातला सर्वांत मोठा पक्ष झाला आहे. त्यांच्याकडे इतकी मोठमोठी लोकं जात आहेत. त्यामुळे तिथे माझ्यासारख्या गरिबाचे काय काम, असा सवाल करीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, पक्षप्रवेशाची चर्चा ही माध्यमांमध्येच आहे. कदाचित भाजपवाल्यांनाही तसे वाटत नसेल. मुख्यमंत्र्यांसमवेत माझ्या भेटी विरोधी पक्षनेता म्हणून होत आहेत. इतर कामांसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाही का? अशा भेटीवरून कोणीही गैरसमज निर्माण करून घेऊ नये.ते म्हणाले, दिवंगत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, पतंगराव कदम, आर. आर. पाटील ही कृष्णाकाठची माणसं विचाराला पक्की होती. त्याच विचाराने सर्वांनी पुढे जाणे गरजेचे होते. मात्र, बदललेल्या परिस्थितीमुळे काहीजण वेगळे निर्णय घेत आहेत. आज कोण कुठल्या पक्षात जाईल, याचा नेम राहिलेला नाही.एखाद्या नेत्यावर आरोप करून त्यांना जेरीस आणायचे आणि नंतर त्यालाच पक्षात प्रवेश द्यायचा, ही महाराष्ट्रात सध्याची राजकारणाची नवी पध्दत सुरू झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश केला की, संबंधितांवरील सर्व आरोप निघून जातात. जे लोक त्यांच्यावर टीका करायचे, तेच लोक आता त्यांचा हार घालून सत्कार करताहेत. सर्वांना सत्तेत जायची घाई झालेली आहे. पक्षप्रवेशातून भाजप नेत्यांना राज्याकडे पाहण्यासाठी वेळ मिळत नाही.

पूर येऊ नये, यासाठी प्रार्थनाजयंत पाटील यांनी पूर परिस्थिती आणि पाऊस यावर भाष्य केले. यावर्षी पूर येऊ नये, अशी प्रार्थना करतो. पूर येऊ नये, यासाठी सरकारने लक्ष घातले पाहिजे. पाटबंधारे विभागाने योग्यवेळी पाणी सोडले पाहिजे आणि नियोजन केले पाहिजे.

आंदोलनकर्त्यांचे ऐकून घ्याअलमट्टीबाबत जयंत पाटील म्हणाले, अलमट्टी धरणाचा जो प्रश्न आहे, त्या भागातील लोकांनी जी मतं मांडली आहेत, आंदोलने केली आहेत, सरकारने त्यांचं म्हणणं न ऐकता ज्यांनी आंदोलने केली नाहीत, अशा लोकांना सरकारने बोलावले. आंदोलनकर्त्यांचे प्रश्न सरकारने ऐकून घेतले पाहिजेत.