सांगली : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इच्छा होती. त्या अनुषंगाने गेल्या सहा महिन्यांत काही बैठकांमधून त्यांनी ही इच्छा बोलूनही दाखवली होती. शरद पवार यांच्या देखतच दोन्ही पक्ष एक व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आमदार जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
जयंत पाटील यांनी गेल्या सहा महिन्यातील घडामोडीवर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हयातीतच एकत्रीकरणाची त्यांची इच्छा होती. शरद पवार यांनी त्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली होती. त्याच्या तयारीसाठी बारामतीमध्ये नेत्यांची बैठक झाली. त्यासाठी आम्ही विमानातून जाणार होतो. पण, तेथील धावपट्टीवर उतरण्याच्या क्षमतेचे विमान उपलब्ध झाले नाही. त्यामुळे १२ फेब्रुवारी रोजी विलीनीकरणाची बैठक ठरली होती. प्रथम एकत्रीकरण आणि नंतर बाकीचे निर्णय अशी भूमिका अजितदांदाची होती. या चर्चांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश होता.
अलीकडील काळात अजित पवार अनेकदा माझ्या घरी आले होते. चारवेळा सायंकाळी आले होते. चर्चा आणि जेवण करून जात होते. माझी जनमानसातील प्रतिमा पुसून पुन्हा शरद पवार यांच्यासोबत यायचे आहे,’ असे ते म्हणाले होते. त्यासाठी माझ्या घरी सुमारे आठ ते दहा बैठका झाल्या होत्या. त्यांच्या मनात शरद पवार यांच्याविषयी प्रचंड आदर होता.
आम्ही १२ जानेवारी ही तारीख दिली
‘झालं-गेलं सगळं विसरून, गेल्या दोन-अडीच वर्षांचा कालखंड मागे टाकून आपण सगळे एक होऊ आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंध करू,’ ही त्यांची अंतिम भूमिका होती. यातील शेवटची बैठक १६ जानेवारी रोजी झाली. त्यावेळी माझ्या घरी आमचे मुख्य नेतेही उपस्थित होते. तत्पूर्वी खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतही बैठक झाली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढण्याचे ठरले होते. सोयीची तारीख ठरविण्याची मोकळीक अजित पवार यांनी मला दिली होती. त्यानुसार आम्ही १२ जानेवारी ही तारीख दिली होती.
दुसऱ्या दिवशी पहाटेच शरद पवार यांना भेटायला जाण्याचे नियोजन केले होते. बारामतीची धावपट्टी लहान असल्याने गाडीने जाण्याचेही नियोजन होते. त्यानुसार आम्ही सकाळी आठ वाजता शरद पवार यांना भेटलो. सविस्तर चर्चेअंती जिल्हा परिषदेच्या निकालानंतरची १२ तारीख निश्चित केली. चर्चा बऱ्यापैकी पुढे गेली होती.
एकत्रीकरणासंदर्भात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या पक्षातील आमदारांनाही अजित पवार यांनी कल्पना दिली होती. तसे त्यांनी आम्हाला सांगितले होते. ‘मी निर्णय सांगतो, तुम्ही चिंता करू नका, माझे सहकारी मी म्हणेन त्याप्रमाणे निर्णय घेतील,’ असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले होते, असेही जयंत पाटील म्हणाले.
सुनेत्रा पवार यांचा निर्णय पक्षांतर्गत
जयंत पाटील म्हणाले, ‘सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर काही भाष्य करू इच्छित नाही. पटेल, तटकरे आणि काही प्रमाणात भुजबळ यांच्या भूमिकेनुसार निर्णय होत असतील. त्यांच्या पक्षाबद्दल मला काही माहिती नाही. त्याबद्दल बोलणे योग्य आहे असे मला वाटत नाही. नियती किती क्रूर असू शकते हे अजित पवार यांच्या घटनेवरून दिसून येते. विमान हवेत असताना मोठा आवाज येत होता, असे तेथील एका सरपंचांनी मला सांगितले. नेमकी समस्या ब्लॅक बॉक्समधून समोर येईल.’
...तर अजितदादा चांगले मुख्यमंत्री झाले असते
जयंत पाटील म्हणाले, “अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, आर.आर. पाटील आणि माझ्यामध्ये कधीही स्पर्धा नव्हती. राजकारणामध्ये मर्यादा कशा सांभाळायच्या याचे उत्तम ज्ञान अजित पवार यांना होते. ते आणि मी कधीही मर्यादा सोडून परस्परांवर बोललो नाही. अजित पवार मुख्यमंत्री झाले असते, तर प्रभावी काम केले असते. निर्णयाची अंमलबजावणी करण्यात त्यांचा हातखंडा होता. ते चांगले मुख्यमंत्री बनले असते.
Web Summary : Ajit Pawar wanted NCP merger, discussions held at Jayant Patil's home. He expressed respect for Sharad Pawar. Meetings occurred, aiming for reunification before district council elections. Ajit assured colleagues' support. Setback occurred with Sunetra Pawar's oath.
Web Summary : अजित पवार एनसीपी विलय चाहते थे, जयंत पाटिल के घर पर चर्चा हुई। उन्होंने शरद पवार के प्रति सम्मान व्यक्त किया। जिला परिषद चुनावों से पहले पुनर्मिलन के उद्देश्य से बैठकें हुईं। अजित ने सहयोगियों के समर्थन का आश्वासन दिया। सुनेत्रा पवार के शपथ के साथ झटका लगा।