शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

Sangli news: म्हैसाळ सिंचन प्रकल्पाचा पाणीउपसा थांबवला, शेतकरी चिंतेत

By संतोष भिसे | Updated: July 3, 2023 14:12 IST

पूराचे पाणी दुष्काळी पट्ट्यात

सांगली : म्हैसाळ प्रकल्पातून गेले पाच महिने सुरु असलेला पाणीउपसा अखेर थांबविण्यात आला. कोयना धरणात आणि कृष्णा नदीपात्रात पाणी नसल्याने पंप बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.गेल्या महिन्याभरापासून कृष्णेत पाण्याचा ठणठणाट जाणवत आहे. सध्या पाणी आले असले, तरी ते पिण्यापुरतेच आहे. त्यामुळे सिंचनासाठीच्या उपशावर पाटबंधारे विभागाने काहीवेळा निर्बंध लादले होते. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पाठपुराव्यानंतर उपसाबंदी उठवण्यात आली, पण नदीत पाणीच नसल्याने म्हैसाळ प्रकल्पाचे पंप बंद करावे लागले. कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या मिरज, कवठेमहांकाळ किंवा तासगाव तालुक्यातून पाण्याची मागणी नव्हती. जतमध्ये पाणीपुरवठा सुरु होता, पण नदीत पाणी नसल्याने उपशावर मर्यादा येत होत्या. पहिल्या तीन पंपगृहांमध्ये दोन किंवा तीनच पंप सुरु ठेवता येत होते. जतला पाणी देण्यासाठी पहिल्या दोन पंपगृहांत १५ ते १८ पंप सुरु ठेवणे आवश्यक ठरते. पण नदीत पाणी नसल्याने पंपांची संख्या वाढवता आली नाही. परिणाम चार दिवसांपूर्वी उपसा पूर्णत: बंद करण्यात आला.सध्या प्रकल्पाचा मुख्य कालवा कोरडा पडला आहे. या चारही तालुक्यांत दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. तलाव, ओढे-नाले कोरडेच आहेत. या स्थितीत प्रकल्पाच्या पाण्याचा शेतकऱ्यांना आधार मिळत होता.

पूराचे पाणी दुष्काळी पट्ट्यात२० जानेवारीरोजी उपसा सुरु केला होता. तब्बल पाच महिने आवर्तन सुरु राहिले. आता जानेवारीमध्ये पुढील आवर्तन सुरु होण्याची शक्यता आहे. पण धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्यास पुराचे संकट टाळण्यासाठी ऐन पावसाळ्यात उपसा पुन्हा सुरु केला जाऊ शकतो. हे पाणी दुष्काळी पट्ट्याला पुरवले जाईल.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी