शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; तरीही २० गावे, १२५ वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 18:45 IST

५४ हजारांवर लोकसंख्येला २६ टँकर

सांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागात आणि आटपाडी तालुक्यांच्या काही भागामध्ये रिमझिम पाऊस वगळता अद्यापही धुवाधार पाऊस झाला नाही. त्यामुळे पाणीटंचाई हटण्याचे काय नाव घेईना. परिणामी आजही २० गावांसह १२५ वाड्या-वस्त्यांवर २६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, तर दुसरीकडे छोटे-मोठे पाझर तलाव, सिमेंट बंधारे अद्यापही कोरडेठाक पाहावयास वास्तव चित्र पाहवयास मिळत आहे.जून, जुलै हे दोन महिने संपून ऑगस्ट महिना निम्मा संपत आला तरी अद्याप जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये धुवाधार पाऊस झाला नाही. त्यामुळे पाझर तलाव, सिमेंट बंधारे, साखळी बंधारे कोरडेठाक आहे. रिमझिम पावसामुळे खरिपाची पिके चांगली आली आहे. जर धुवाधार पाऊस झाला नाही तर लवकरच भीषण पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतोय की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. जत तालुक्यातील १७ गावे आणि ९६ वाड्या-वस्त्यांवर २४ टँकरद्वारे आजही पाणीपुरवठा केला जात आहे.आटपाडी तालुक्यातील तीन गावे आणि २९ वाड्यांना दोन टँकरने पाणीपुरवठा होत आहे. जत, आटपाडी तालुक्यालाच दुष्काळ हटण्यासाठी धुवाधार पावसांची गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने २० गावांसह १२५ वाड्या-वस्त्यांचे टँकर बंद होतील, अन्यथा पाऊस झाला नाहीतर तर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढावल्याशिवाय राहणार नाही.

या गावात आजही टँकरद्वारे पाणीपुरवठाजत तालुक्यातील सिंदूर, पांढरेवाडी, बसर्गी, सोन्याळ, गुगवाड, संख, उमराणी, मुचंडी, लमाणतांडा (दरिबडची), केरेवाडी (कोणत्याणबोबलाद), गोंधळेवाडी, खोजनवाडी, कुलाळवाडी, बेवनूर, उमदी, गुड्डापूर, उंटवाडी, आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी, उंबरगाव, विभूतवाडी, दिघंची (वाड्यांसाठी) येथे आजही २६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

जत, आटपाडी तालुक्यात टंचाईस्थिती

  • टंचाईग्रस्त गावे २०, वाड्या १२५
  • टँकरची संख्या : १२६
  • टंचाईग्रस्त लोकसंख्या : ५४१७३
  • टंचाईग्रस्त पशुधन संख्या : १२४१४
टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसWaterपाणी