शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

उत्तर-पूर्व कर्नाटकात पाणीटंचाई, कर्नाटकने महाराष्ट्राकडे मागितले ६ टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 12:09 IST

अधिकारी म्हणतात, आम्हाला काहीच माहिती नाही!

सांगली : उत्तर-पूर्व कर्नाटकातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे कृष्णा नदीतून तीन आणि भीमा नदीतून तीन टीएमसी पाणी सोडावे, अशी विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बुधवारी केली. पाणी देण्याबाबत महाराष्ट्राने अद्याप कोणताही प्रतिसाद कर्नाटकला दिला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटले की, उत्तर-पूर्व कर्नाटकातील बेळगाव, विजयपूर, बागलकोट, कलबुर्गी, यादगिरी आणि रायचूर जिल्ह्यातील गावांमध्ये तीव्र उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. मार्च महिन्यापासूनच टंचाई असल्यामुळे पाण्याची नितांत गरज आहे. नागरिकांच्या आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून वारणा (चांदोली) आणि कोयना धरणातून कृष्णा नदीत तीन टीएमसी आणि उजनी जलाशयातून भीमा नदीत तीन टीएमसी पाणी सोडण्याची विनंती कर्नाटक सरकारने यापूर्वीच केली आहे. महाराष्ट्र सरकारने या मागणीचा विचार करून मेच्या पहिल्या पंधरवड्यात एक टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडले आहे. कर्नाटकातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तीव्र उन्हाळा अजूनही कायम आहे. या जिल्ह्यांतील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने, पशुधन आणि घरगुती वापरासाठी पाण्याची गरज आहे. उत्तर कर्नाटकामध्ये अद्याप मान्सून सुरू झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने वारणा आणि कोयना धरणातून दोन टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडण्याची गरज आहे. सोबत तीन टीएमसी पाणी उजनी जलाशयातून भीमा नदीत सोडावे. पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने सूचना द्याव्यात.

अधिकारी म्हणतात, आम्हाला काहीच माहिती नाही!कर्नाटक सरकारने पाणी सोडण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत सांगलीच्या जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कर्नाटकसाठी पाणी सोडण्याबाबत आम्हाला कोणतीही सूचना नाही. शिवाय सध्या कोयना आणि वारणा धरणात पुरेसा पाणीसाठा नाही. आपल्या दुष्काळी तालुक्यांसाठीच्या पाणी योजना सुरू ठेवण्यासाठी पाणी कमी पडत आहे.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणी