शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर-पूर्व कर्नाटकात पाणीटंचाई, कर्नाटकने महाराष्ट्राकडे मागितले ६ टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 12:09 IST

अधिकारी म्हणतात, आम्हाला काहीच माहिती नाही!

सांगली : उत्तर-पूर्व कर्नाटकातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे कृष्णा नदीतून तीन आणि भीमा नदीतून तीन टीएमसी पाणी सोडावे, अशी विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बुधवारी केली. पाणी देण्याबाबत महाराष्ट्राने अद्याप कोणताही प्रतिसाद कर्नाटकला दिला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटले की, उत्तर-पूर्व कर्नाटकातील बेळगाव, विजयपूर, बागलकोट, कलबुर्गी, यादगिरी आणि रायचूर जिल्ह्यातील गावांमध्ये तीव्र उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. मार्च महिन्यापासूनच टंचाई असल्यामुळे पाण्याची नितांत गरज आहे. नागरिकांच्या आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून वारणा (चांदोली) आणि कोयना धरणातून कृष्णा नदीत तीन टीएमसी आणि उजनी जलाशयातून भीमा नदीत तीन टीएमसी पाणी सोडण्याची विनंती कर्नाटक सरकारने यापूर्वीच केली आहे. महाराष्ट्र सरकारने या मागणीचा विचार करून मेच्या पहिल्या पंधरवड्यात एक टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडले आहे. कर्नाटकातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तीव्र उन्हाळा अजूनही कायम आहे. या जिल्ह्यांतील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने, पशुधन आणि घरगुती वापरासाठी पाण्याची गरज आहे. उत्तर कर्नाटकामध्ये अद्याप मान्सून सुरू झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने वारणा आणि कोयना धरणातून दोन टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडण्याची गरज आहे. सोबत तीन टीएमसी पाणी उजनी जलाशयातून भीमा नदीत सोडावे. पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने सूचना द्याव्यात.

अधिकारी म्हणतात, आम्हाला काहीच माहिती नाही!कर्नाटक सरकारने पाणी सोडण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत सांगलीच्या जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कर्नाटकसाठी पाणी सोडण्याबाबत आम्हाला कोणतीही सूचना नाही. शिवाय सध्या कोयना आणि वारणा धरणात पुरेसा पाणीसाठा नाही. आपल्या दुष्काळी तालुक्यांसाठीच्या पाणी योजना सुरू ठेवण्यासाठी पाणी कमी पडत आहे.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणी