शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

सांगली जिल्ह्यात काही गावात पाणीटंचाई; आठवड्यातून एकदा मिळतेय पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:57 IST

सांगली : उन्हाळ्याची चाहूल लागताच जिल्ह्यातील अनेक गावांत टँकरचे वारे वाहू लागते. दरवर्षीचा उन्हाळा जिल्ह्यात पाणीटंचाईचा काळ असतो. यावर्षीही ...

सांगली : उन्हाळ्याची चाहूल लागताच जिल्ह्यातील अनेक गावांत टँकरचे वारे वाहू लागते. दरवर्षीचा उन्हाळा जिल्ह्यात पाणीटंचाईचा काळ असतो. यावर्षीही काही ठिकाणी पाणीटंचाई आहे. वीजटंचाई, नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा बेदरकार वापर ही पाणीटंचाईची कारणे आहेत.फेब्रुवारी महिना असूनही जिल्ह्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. सांगली, मिरजेसारख्या शहरांमध्ये अजून तरी पाण्यावरून स्फोटक स्थिती तयार झालेली नाही. काही शहरे आणि गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असली तरी त्यामागचे कारण नैसर्गिक कमी आणि नियोजनाचा अभाव हेच अधिक दिसते. टँकरची गरज ही लोकांपेक्षा सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचीच अधिक असल्याचे जाणवते. सध्या सुमारे पंचवीसभर गावे आणि वाड्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. यात सर्वाधिक टँकर जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यांत लागण्याची शक्यता आहे.

महापालिका क्षेत्रातील काही विस्तारित भागातही टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे, मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. अग्निशमन दलाचे तसेच पाणीपुरवठा विभागाचे काही टँकर तेथे पाणीपुरवठा करतात.जत, आटपाडीत जानेवारीपासून उन्हाळा!जत आणि आटपाडी तालुक्यात जानेवारीपासूनच पाण्याची दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. विशेषतः जत तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांत पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे.

टोलेजंग इमारती, दर १५ फुटांवर बोअरमहापालिका क्षेत्रात टोलेजंग इमारतींच्या जंगलात दर १५ फूट अंतरावर रहिवाशांकडून बोअर खोदण्यात आल्या आहेत. सांगली, मिरजेतील विस्तारित भागातील काही उपनगरात अनेक वर्षांपासून टँकरनेच पाणी पुरविले जाते.टँकर आता सुरू; पुढे काय?जिल्ह्यात काही भागात टँकरने सध्या सुरळीत पाणीपुरवठा सुरू असला तरी ऐन एप्रिल, मे महिन्यात टंचाईची तीव्रता वाढणार आहे. त्यावेळी जिल्हाभरात टँकरची मागणीही वाढणार आहे.पाणी आले की लाइट गायब होते

  • ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या पाणीयोजनांचे मूळ स्त्रोत आटू लागले आहेत.
  • काही ठिकाणी तब्बल आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे.
  • मात्र पाणी येताच वीजपुरवठा गायब होत असल्याने पाण्याचा उपसा मुश्कील झाला आहे.

नळ कोरडे; गल्लीत पाट वाहतायकाही गावांत पाणी योजनांना मोठी गळती आहे. तेथे घरोघरी नळ कोरडे आहेत, मात्र मुख्य वाहिनीच्या गळतीमुळे रस्तोरस्ती पाण्याचे धो-धो पाट वाहताना दिसतात.

टँकर अन् जारच्या टेन्शनने बेजार!ही गावे टँकर आणि जारच्या टेन्शनने हैराण आहेत. गावोगावी खासगी फिल्टर प्रकल्प सुरू झाले असून, तेथे पाण्याची विक्री सुरू आहे.

गावात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. पाणीयोजनेचा मुख्य स्त्रोत असलेल्या तलावात मुबलक पाणीसाठा आहे, मात्र योजनेला गळती लागल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पिण्याचे पाणी विकत आणतो; मात्र वापराचे पाणी कोठून आणायचे, हा प्रश्न आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करायला हवी. - राजेंद्र पाटील, ग्रामस्थ, आरग (ता. मिरज)

टॅग्स :Sangliसांगलीdroughtदुष्काळWaterपाणी