शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सांगली जिल्ह्यात काही गावात पाणीटंचाई; आठवड्यातून एकदा मिळतेय पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:57 IST

सांगली : उन्हाळ्याची चाहूल लागताच जिल्ह्यातील अनेक गावांत टँकरचे वारे वाहू लागते. दरवर्षीचा उन्हाळा जिल्ह्यात पाणीटंचाईचा काळ असतो. यावर्षीही ...

सांगली : उन्हाळ्याची चाहूल लागताच जिल्ह्यातील अनेक गावांत टँकरचे वारे वाहू लागते. दरवर्षीचा उन्हाळा जिल्ह्यात पाणीटंचाईचा काळ असतो. यावर्षीही काही ठिकाणी पाणीटंचाई आहे. वीजटंचाई, नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा बेदरकार वापर ही पाणीटंचाईची कारणे आहेत.फेब्रुवारी महिना असूनही जिल्ह्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. सांगली, मिरजेसारख्या शहरांमध्ये अजून तरी पाण्यावरून स्फोटक स्थिती तयार झालेली नाही. काही शहरे आणि गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असली तरी त्यामागचे कारण नैसर्गिक कमी आणि नियोजनाचा अभाव हेच अधिक दिसते. टँकरची गरज ही लोकांपेक्षा सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचीच अधिक असल्याचे जाणवते. सध्या सुमारे पंचवीसभर गावे आणि वाड्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. यात सर्वाधिक टँकर जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यांत लागण्याची शक्यता आहे.

महापालिका क्षेत्रातील काही विस्तारित भागातही टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे, मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. अग्निशमन दलाचे तसेच पाणीपुरवठा विभागाचे काही टँकर तेथे पाणीपुरवठा करतात.जत, आटपाडीत जानेवारीपासून उन्हाळा!जत आणि आटपाडी तालुक्यात जानेवारीपासूनच पाण्याची दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. विशेषतः जत तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांत पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे.

टोलेजंग इमारती, दर १५ फुटांवर बोअरमहापालिका क्षेत्रात टोलेजंग इमारतींच्या जंगलात दर १५ फूट अंतरावर रहिवाशांकडून बोअर खोदण्यात आल्या आहेत. सांगली, मिरजेतील विस्तारित भागातील काही उपनगरात अनेक वर्षांपासून टँकरनेच पाणी पुरविले जाते.टँकर आता सुरू; पुढे काय?जिल्ह्यात काही भागात टँकरने सध्या सुरळीत पाणीपुरवठा सुरू असला तरी ऐन एप्रिल, मे महिन्यात टंचाईची तीव्रता वाढणार आहे. त्यावेळी जिल्हाभरात टँकरची मागणीही वाढणार आहे.पाणी आले की लाइट गायब होते

  • ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या पाणीयोजनांचे मूळ स्त्रोत आटू लागले आहेत.
  • काही ठिकाणी तब्बल आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे.
  • मात्र पाणी येताच वीजपुरवठा गायब होत असल्याने पाण्याचा उपसा मुश्कील झाला आहे.

नळ कोरडे; गल्लीत पाट वाहतायकाही गावांत पाणी योजनांना मोठी गळती आहे. तेथे घरोघरी नळ कोरडे आहेत, मात्र मुख्य वाहिनीच्या गळतीमुळे रस्तोरस्ती पाण्याचे धो-धो पाट वाहताना दिसतात.

टँकर अन् जारच्या टेन्शनने बेजार!ही गावे टँकर आणि जारच्या टेन्शनने हैराण आहेत. गावोगावी खासगी फिल्टर प्रकल्प सुरू झाले असून, तेथे पाण्याची विक्री सुरू आहे.

गावात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. पाणीयोजनेचा मुख्य स्त्रोत असलेल्या तलावात मुबलक पाणीसाठा आहे, मात्र योजनेला गळती लागल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पिण्याचे पाणी विकत आणतो; मात्र वापराचे पाणी कोठून आणायचे, हा प्रश्न आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करायला हवी. - राजेंद्र पाटील, ग्रामस्थ, आरग (ता. मिरज)

टॅग्स :Sangliसांगलीdroughtदुष्काळWaterपाणी