शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

सांगली जिल्ह्यात काही गावात पाणीटंचाई; आठवड्यातून एकदा मिळतेय पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:57 IST

सांगली : उन्हाळ्याची चाहूल लागताच जिल्ह्यातील अनेक गावांत टँकरचे वारे वाहू लागते. दरवर्षीचा उन्हाळा जिल्ह्यात पाणीटंचाईचा काळ असतो. यावर्षीही ...

सांगली : उन्हाळ्याची चाहूल लागताच जिल्ह्यातील अनेक गावांत टँकरचे वारे वाहू लागते. दरवर्षीचा उन्हाळा जिल्ह्यात पाणीटंचाईचा काळ असतो. यावर्षीही काही ठिकाणी पाणीटंचाई आहे. वीजटंचाई, नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा बेदरकार वापर ही पाणीटंचाईची कारणे आहेत.फेब्रुवारी महिना असूनही जिल्ह्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. सांगली, मिरजेसारख्या शहरांमध्ये अजून तरी पाण्यावरून स्फोटक स्थिती तयार झालेली नाही. काही शहरे आणि गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असली तरी त्यामागचे कारण नैसर्गिक कमी आणि नियोजनाचा अभाव हेच अधिक दिसते. टँकरची गरज ही लोकांपेक्षा सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचीच अधिक असल्याचे जाणवते. सध्या सुमारे पंचवीसभर गावे आणि वाड्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. यात सर्वाधिक टँकर जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यांत लागण्याची शक्यता आहे.

महापालिका क्षेत्रातील काही विस्तारित भागातही टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे, मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. अग्निशमन दलाचे तसेच पाणीपुरवठा विभागाचे काही टँकर तेथे पाणीपुरवठा करतात.जत, आटपाडीत जानेवारीपासून उन्हाळा!जत आणि आटपाडी तालुक्यात जानेवारीपासूनच पाण्याची दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. विशेषतः जत तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांत पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे.

टोलेजंग इमारती, दर १५ फुटांवर बोअरमहापालिका क्षेत्रात टोलेजंग इमारतींच्या जंगलात दर १५ फूट अंतरावर रहिवाशांकडून बोअर खोदण्यात आल्या आहेत. सांगली, मिरजेतील विस्तारित भागातील काही उपनगरात अनेक वर्षांपासून टँकरनेच पाणी पुरविले जाते.टँकर आता सुरू; पुढे काय?जिल्ह्यात काही भागात टँकरने सध्या सुरळीत पाणीपुरवठा सुरू असला तरी ऐन एप्रिल, मे महिन्यात टंचाईची तीव्रता वाढणार आहे. त्यावेळी जिल्हाभरात टँकरची मागणीही वाढणार आहे.पाणी आले की लाइट गायब होते

  • ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या पाणीयोजनांचे मूळ स्त्रोत आटू लागले आहेत.
  • काही ठिकाणी तब्बल आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे.
  • मात्र पाणी येताच वीजपुरवठा गायब होत असल्याने पाण्याचा उपसा मुश्कील झाला आहे.

नळ कोरडे; गल्लीत पाट वाहतायकाही गावांत पाणी योजनांना मोठी गळती आहे. तेथे घरोघरी नळ कोरडे आहेत, मात्र मुख्य वाहिनीच्या गळतीमुळे रस्तोरस्ती पाण्याचे धो-धो पाट वाहताना दिसतात.

टँकर अन् जारच्या टेन्शनने बेजार!ही गावे टँकर आणि जारच्या टेन्शनने हैराण आहेत. गावोगावी खासगी फिल्टर प्रकल्प सुरू झाले असून, तेथे पाण्याची विक्री सुरू आहे.

गावात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. पाणीयोजनेचा मुख्य स्त्रोत असलेल्या तलावात मुबलक पाणीसाठा आहे, मात्र योजनेला गळती लागल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पिण्याचे पाणी विकत आणतो; मात्र वापराचे पाणी कोठून आणायचे, हा प्रश्न आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करायला हवी. - राजेंद्र पाटील, ग्रामस्थ, आरग (ता. मिरज)

टॅग्स :Sangliसांगलीdroughtदुष्काळWaterपाणी