शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

लाँचिंग प्रतीकचं, टायमिंग जयंतरावांचं; मंत्री जयंत पाटलांची मुलासाठी विधानसभेची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 16:25 IST

विधानसभेचा इस्लामपूर मतदारसंघ मुलासाठी सोडला, तर खुद्द जयंतराव शेजारच्या सांगलीतून उतरतील, असं बोललं जातंय. दुसरीकडं त्यांनी थेट लोकसभाच लढवावी, असाही मतप्रवाह पुढं येऊ लागलाय.

श्रीनिवास नागे

राजकारणात वेळेत केलेलं ‘लाँचिंग’ पुढचा राजमार्ग प्रशस्त करते, असं म्हणतात. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आता चिरंजीव प्रतीक यांच्या राजकारणातील प्रवेशाची तयारी सुरू केलीय. विधानसभेचा इस्लामपूर मतदारसंघ मुलासाठी सोडला, तर खुद्द जयंतराव शेजारच्या सांगलीतून उतरतील, असं बोललं जातंय. दुसरीकडं त्यांनी थेट लोकसभाच लढवावी, असाही मतप्रवाह पुढं येऊ लागलाय.

गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रतीक पाटील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसताहेत. स्वत:चा उद्योग सांभाळत ते मतदारसंघात फिरताहेत. वडिलांच्या माघारी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात त्यांची हजेरी ठरलेलीच. त्यांच्याकडं राज्य व्हॉलिबॉल संघटनेचं अध्यक्षपदही देण्यात आलंय. पहिल्यांदा राजारामबापू साखर कारखान्याचं अध्यक्षपद देऊन नंतर त्यांना राजकारणात उतरवलं जाईल, असं मध्यंतरी सांगितलं जात होतं. नंतर सांगली लोकसभा मतदारसंघात फिरवून जयंतरावांनी गटाची चाचपणी केली होती.

यादरम्यान राजकीय समीकरणं बदलायला लागली. दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील हे जयंतरावांचे पक्षांतर्गत स्पर्धक. आता आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित यांचा धडाकेबाज प्रवेश झालाय. कवठेमहांकाळ नगरपंचायत एकहाती ताब्यात घेताना पक्षातील आणि बाहेरील विरोधकांना चारीमुंड्या चित केल्याचं चित्र निर्माण करण्यात त्यांचे सल्लागार यशस्वी ठरलेत. त्या प्रचारावेळीच रोहित यांनी, ‘पंचविशीचा होईन, तेव्हा विरोधक संपलेले असतील,’ अशी टाळ्या वसूल गर्जना केली होती. ते आता २३ वर्षांचे आहेत, तर प्रतीक २८ वर्षांचे! रोहित २०२४ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवतीलच, असं दिसतंय. ते जिंकून विधानसभेत गेले तर त्यांची ‘सिनिअॅरिटी’ प्रतीक यांच्यासाठी भविष्यातील अडथळा ठरेल. त्यामुळे ‘उतरवलं तर आताच,’ अशी खूणगाठ बांधत जयंतरावांनी मुलासाठी तयारी सुरू केल्याचं सांगितलं जातंय.

ती वेळ आणि ही वेळ

राजारामबापूंचं निधन झालं, तेव्हा जयंतराव २४ वर्षांचे होते. आधी त्यांनी पाच-सहा वर्षे साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळली आणि नंतर विधानसभेत गेले. आता त्यांनी जिल्हाभर स्वत:चा गट निर्माण केलाय. प्रतीक यांच्यासाठी इस्लामपूर हाच सुरक्षित मतदारसंघ आहे. दांडगा लोकसंपर्क, कार्यकर्त्यांचा मजबूत गट, सहकारी संस्थांचं जाळं या जोरावर आणि विरोधक कधीच एकत्र येत नसल्यानं जयंतरावांनी सातवेळा मैदान मारलंय. आता ते साठीत आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील वजनदार मंत्री आहेत. राज्यात पक्षाची हवा आहे आणि विरोधक विखुरलेत. त्यामुळं मुलाच्या राजकीय ‘लाँचिंग’साठी यासारखी योग्य वेळ ती कोणती! हे ‘टायमिंग’ साधायचं जयंतराव सोडतील का?

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस