शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
3
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
4
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
5
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
6
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
7
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
8
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
9
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
10
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
11
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
12
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
13
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
14
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
15
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
16
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
17
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
18
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
19
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
20
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”

लाँचिंग प्रतीकचं, टायमिंग जयंतरावांचं; मंत्री जयंत पाटलांची मुलासाठी विधानसभेची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 16:25 IST

विधानसभेचा इस्लामपूर मतदारसंघ मुलासाठी सोडला, तर खुद्द जयंतराव शेजारच्या सांगलीतून उतरतील, असं बोललं जातंय. दुसरीकडं त्यांनी थेट लोकसभाच लढवावी, असाही मतप्रवाह पुढं येऊ लागलाय.

श्रीनिवास नागे

राजकारणात वेळेत केलेलं ‘लाँचिंग’ पुढचा राजमार्ग प्रशस्त करते, असं म्हणतात. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आता चिरंजीव प्रतीक यांच्या राजकारणातील प्रवेशाची तयारी सुरू केलीय. विधानसभेचा इस्लामपूर मतदारसंघ मुलासाठी सोडला, तर खुद्द जयंतराव शेजारच्या सांगलीतून उतरतील, असं बोललं जातंय. दुसरीकडं त्यांनी थेट लोकसभाच लढवावी, असाही मतप्रवाह पुढं येऊ लागलाय.

गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रतीक पाटील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसताहेत. स्वत:चा उद्योग सांभाळत ते मतदारसंघात फिरताहेत. वडिलांच्या माघारी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात त्यांची हजेरी ठरलेलीच. त्यांच्याकडं राज्य व्हॉलिबॉल संघटनेचं अध्यक्षपदही देण्यात आलंय. पहिल्यांदा राजारामबापू साखर कारखान्याचं अध्यक्षपद देऊन नंतर त्यांना राजकारणात उतरवलं जाईल, असं मध्यंतरी सांगितलं जात होतं. नंतर सांगली लोकसभा मतदारसंघात फिरवून जयंतरावांनी गटाची चाचपणी केली होती.

यादरम्यान राजकीय समीकरणं बदलायला लागली. दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील हे जयंतरावांचे पक्षांतर्गत स्पर्धक. आता आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित यांचा धडाकेबाज प्रवेश झालाय. कवठेमहांकाळ नगरपंचायत एकहाती ताब्यात घेताना पक्षातील आणि बाहेरील विरोधकांना चारीमुंड्या चित केल्याचं चित्र निर्माण करण्यात त्यांचे सल्लागार यशस्वी ठरलेत. त्या प्रचारावेळीच रोहित यांनी, ‘पंचविशीचा होईन, तेव्हा विरोधक संपलेले असतील,’ अशी टाळ्या वसूल गर्जना केली होती. ते आता २३ वर्षांचे आहेत, तर प्रतीक २८ वर्षांचे! रोहित २०२४ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवतीलच, असं दिसतंय. ते जिंकून विधानसभेत गेले तर त्यांची ‘सिनिअॅरिटी’ प्रतीक यांच्यासाठी भविष्यातील अडथळा ठरेल. त्यामुळे ‘उतरवलं तर आताच,’ अशी खूणगाठ बांधत जयंतरावांनी मुलासाठी तयारी सुरू केल्याचं सांगितलं जातंय.

ती वेळ आणि ही वेळ

राजारामबापूंचं निधन झालं, तेव्हा जयंतराव २४ वर्षांचे होते. आधी त्यांनी पाच-सहा वर्षे साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळली आणि नंतर विधानसभेत गेले. आता त्यांनी जिल्हाभर स्वत:चा गट निर्माण केलाय. प्रतीक यांच्यासाठी इस्लामपूर हाच सुरक्षित मतदारसंघ आहे. दांडगा लोकसंपर्क, कार्यकर्त्यांचा मजबूत गट, सहकारी संस्थांचं जाळं या जोरावर आणि विरोधक कधीच एकत्र येत नसल्यानं जयंतरावांनी सातवेळा मैदान मारलंय. आता ते साठीत आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील वजनदार मंत्री आहेत. राज्यात पक्षाची हवा आहे आणि विरोधक विखुरलेत. त्यामुळं मुलाच्या राजकीय ‘लाँचिंग’साठी यासारखी योग्य वेळ ती कोणती! हे ‘टायमिंग’ साधायचं जयंतराव सोडतील का?

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस