शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सांगली शहरात पुन्हा पाण्याचा ठणठणाट : आज बहुतांश भागात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 23:05 IST

महापालिकेच्या उपसा पंप व जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा सोमवारी दुपारी खंडित झाल्याने सोमवारी सांगली व कुपवाड परिसरातील काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला. मंगळवारीही शेरीनाला योजनेच्या कामामुळे दिवसभर विद्युत पुरवठा खंडित राहणार

ठळक मुद्देविद्युत पुरवठा खंडित

सांगली : महापालिकेच्या उपसा पंप व जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा सोमवारी दुपारी खंडित झाल्याने सोमवारी सांगली व कुपवाड परिसरातील काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला. मंगळवारीही शेरीनाला योजनेच्या कामामुळे दिवसभर विद्युत पुरवठा खंडित राहणार असल्याने, शहराच्या बहुतांश भागात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

सांगलीत सोमवारी रंगपंचमीच्या सणालाच पाणीटंचाई निर्माण झाली. शिवोदयनगर, लक्ष्मीनगर, अजिंक्यनगर, संजयनगर, साठेनगर, चैतन्यनगर, दडगे प्लॉट, जगदाळे प्लॉट, पाटणे प्लॉट, रेळेकर प्लॉट, अभिनंदन कॉलनी, राम रहिम कॉलनी, साईनगर, शिंदे मळा, टिळकनगर, हुडको कॉलनी आदी भागात सोमवारी दिवसभर पाणीपुरवठा होऊ शकला नाही. दुपारी साडेतीन वाजता पाणीपुरवठा यंत्रणेचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने माळबंगल्यावरील पाण्याच्या टाक्या भरू शकल्या नाहीत. त्यामुळे रात्री अनेक भागातील पाणीपुरवठा बंद झाला.

मंगळवारीसुद्धा शहराच्या बहुतांश भागासह कुपवाड परिसरातही अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. काही ठिकाणी दिवसभर पाणीपुरवठाच करणे शक्य होणार नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सांगलीत गेल्या काही दिवसांपासून वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. कधी नदीपात्रातील पाणी पातळीत घट झाल्याने, तर कधी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. गत आठवड्यात शहराच्या बहुतांश भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला.सोमवारी पुन्हा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. माळबंगल्यावरील टाक्यांमध्ये पाणी भरता आले नाही. रात्री उशिरापर्यंत टँकरही याठिकाणी पाण्याची प्रतीक्षा करीत थांबले होते.नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याने मंगळवारी काही भागात महापालिकेस टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

अशा परिस्थितीत पुन्हा पाण्यासाठी नागरिकांना धावाधाव करावी लागणार आहे. अचानक उद्भवलेल्या या विद्युत समस्येमुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू आहे. पर्यायी व्यवस्था करताना त्यांची दमछाक होत आहे. 

महावितरणला : पत्रमंगळवारी शेरीनाला योजनेच्या कामासाठी दिवसभर विद्युत पुरवठा खंडितचे नियोजन होते. ते रद्द करण्याची विनंती महापालिकेने कंपनीला केली आहे. महावितरणने रात्री उशिरा ही विनंती मान्य केल्याने काहीअंशी पाणीटंचाईची समस्या दूर झाली आहे. 

पाण्याची काटकसर : करण्याचे आवाहनसांगली, कुपवाड परिसरात मंगळवारी अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी मंगळवारी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSangliसांगलीmahavitaranमहावितरण