शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

कृष्णा नदीतील पाणी पातळीत घट; सिंचन योजना ठप्प, पिकांचे मोठे नुकसान  

By अशोक डोंबाळे | Updated: May 29, 2023 19:02 IST

जलसंपदा विभागामधील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कृष्णा नदीकाठच्या गावांमध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

सांगली : टेंभू, ताकारी उपसा सिंचन योजनांतून दुष्काळी भागाला पाणी उपसा होत आहे. यामुळे कृष्णा नदीतीलपाणी पातळी घटली आहे. नदीत पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे वाळवा, मिरज आणि पलूस तालुक्यातील उपसा सिंचन योजना ठप्प झाल्या आहेत. यामुळे कृष्णा नदीत कोयना धरणातून जादा पाणी सोडावे, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली आहे.गेल्या १० ते १५ दिवसांपासून भिलवडी ते हरिपूरपर्यंत कृष्णा नदीची पाण्याची पातळी अतिशय कमी झाली आहे. यामुळे नदीकाठच्या शेतीचे उपसा सिंचन येाजनांचे पंप बंद ठेवावे लागत आहेत. परिणामी तीव्र उन्हामुळे पिके वाळू लागली आहेत. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर पाणी सोडण्यात येत असल्याचे जुजबी उत्तर मिळत आहे. कोयनेमधून दोन हजार ७०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे.परंतु, सध्या टेंभू व ताकारी योजनेचे २० पंप चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा होत आहे. त्यामुळे भिलवडी ते हरिपूरपर्यंत फार कमी प्रमाणात पाणी येत आहे. यामुळे कृष्णा नदीत पाणीसाठा कमी आहे. यामुळे कोयना धरणातून जादा पाणी सोडण्याची मागणी सुनील फराटे यांनी केली आहे.

जलसंपदा कार्यालयासमोर आंदोलन करु : सुनील फराटेजलसंपदा विभागामधील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कृष्णा नदीकाठच्या गावांमध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न सांगता कोयनेतून जादा ५०० क्युसेकने पाणी सोडण्याची मागणी केली आहे. अधिकाऱ्यांनी तत्काळ पाणी न सोडल्यास शेतकरी सांगलीतील वारणाली येथील कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत, असा इशाराही सुनील फराटे यांनी सोमवारी दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणी