शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

कृष्णा नदीतील पाणी पातळीत घट; सिंचन योजना ठप्प, पिकांचे मोठे नुकसान  

By अशोक डोंबाळे | Updated: May 29, 2023 19:02 IST

जलसंपदा विभागामधील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कृष्णा नदीकाठच्या गावांमध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

सांगली : टेंभू, ताकारी उपसा सिंचन योजनांतून दुष्काळी भागाला पाणी उपसा होत आहे. यामुळे कृष्णा नदीतीलपाणी पातळी घटली आहे. नदीत पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे वाळवा, मिरज आणि पलूस तालुक्यातील उपसा सिंचन योजना ठप्प झाल्या आहेत. यामुळे कृष्णा नदीत कोयना धरणातून जादा पाणी सोडावे, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली आहे.गेल्या १० ते १५ दिवसांपासून भिलवडी ते हरिपूरपर्यंत कृष्णा नदीची पाण्याची पातळी अतिशय कमी झाली आहे. यामुळे नदीकाठच्या शेतीचे उपसा सिंचन येाजनांचे पंप बंद ठेवावे लागत आहेत. परिणामी तीव्र उन्हामुळे पिके वाळू लागली आहेत. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर पाणी सोडण्यात येत असल्याचे जुजबी उत्तर मिळत आहे. कोयनेमधून दोन हजार ७०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे.परंतु, सध्या टेंभू व ताकारी योजनेचे २० पंप चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा होत आहे. त्यामुळे भिलवडी ते हरिपूरपर्यंत फार कमी प्रमाणात पाणी येत आहे. यामुळे कृष्णा नदीत पाणीसाठा कमी आहे. यामुळे कोयना धरणातून जादा पाणी सोडण्याची मागणी सुनील फराटे यांनी केली आहे.

जलसंपदा कार्यालयासमोर आंदोलन करु : सुनील फराटेजलसंपदा विभागामधील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कृष्णा नदीकाठच्या गावांमध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न सांगता कोयनेतून जादा ५०० क्युसेकने पाणी सोडण्याची मागणी केली आहे. अधिकाऱ्यांनी तत्काळ पाणी न सोडल्यास शेतकरी सांगलीतील वारणाली येथील कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत, असा इशाराही सुनील फराटे यांनी सोमवारी दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणी