शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

Sangli: अखेर कृष्णा कालव्यामध्ये तारळी धरणातून पाणी दाखल, शेतकऱ्यांच्या लढ्यास यश 

By अशोक डोंबाळे | Updated: March 28, 2024 12:04 IST

चार तालुक्यांना एक टीएमसी पर्यंत पाणी मिळणार

सांगली : तारळी धरणातून कृष्णा कालव्यात पाणी सोडण्यासाठी पलूसमध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले. या आंदोलनाच्या लढ्याला आणि अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता तारळी धरणातून कृष्णा कालव्यात पाणी सोडले आहे. या निर्णयामुळे पलूस, वाळवा, तासगाव, मिरज तालुक्यांतील ५४ गावांच्या पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे.

कृष्णा कालव्याचे पाणी पलूस तालुक्यातील तुपारी ते वसगडेपर्यंत जाते. तालुक्यातील बहुतांश शेती ही आरफळ व कृष्णा कालव्यावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून आरफळ योजना व कृष्णा कालव्यात पाणी सोडले नसल्याने या भागातील शेती धोक्यात आली आहे. पाण्याअभावी सध्या ऊस, द्राक्ष, केळी, भाजीपाला, फुल शेतीसह अन्य पिके वाळली आहेत. तरीही जलसंपदा विभागाकडून पाणी सोडले जात नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते. अनेकवेळा आंदोलने करुन ही अधिकारी दखल घेत नसल्याबद्दल ही शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अखेर बुधवारी सकाळी ११ वाजता तारळी धरणातून कृष्णा कालव्यात पाणी सोडले आहे. एक टीएमसी पर्यंत पाणी मिळणार असल्यामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस, वाळवा, तासगाव व मिरज तालुक्यातील १३ हजार ३६६ हेक्टर क्षेत्रातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरीDamधरण