शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

Sangli: कवठेमहांकाळ तालुक्यात आले पाणी, पाणीटंचाई दूर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 15:30 IST

सरपंचांची मागणी व लोकमतच्या पाठपुराव्यास यश..

महेश देसाईकवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात अग्रणी नदीला सोडलेल्या पाण्यामुळे ऐन उन्हाळ्यात अग्रणी नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. यामुळे पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. याबाबत अग्रणी नदीत पाणी सोडण्यासाठी लोकमतने दि. २० एप्रिल रोजी अग्रणी नदीकाठच्या सरपंचांच्या प्रतिक्रिया घेऊन मागणी केली होती. अखेर पाणी सोडल्यामुळे सरपंचांची मागणी व लोकमतच्या पाठपुराव्यास यश आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी लोकमतसह सरपंचांचे आभार मानले आहेत.

कवठेमहांकाळ तालुक्यात सध्या म्हैसाळ व टेंभू सिंचन योजनेचे पाणी कालवा तुडुंब भरून वाहत आहे. हा कालवा भरून वाहत असताना कवठेमहांकाळ तालुक्याची जीवनवाहिनी असलेली अग्रणी नदी कोरडी ठणठणीत पडली होती. अग्रणी काठचे सरपंच व लोकमतच्या पाठपुराव्याला यश आले असून हे पाणी काही दिवसांपूर्वी अग्रणी नदीत सोडले असून हे पाणी धुळगावपर्यंत गुरुवारी पोहोचले आहे.कवठेमहांकाळ तालुक्यात म्हैसाळ योजना असून तालुक्यातील काही गावांना फायदा होत नव्हता. त्यामुळे या अग्रणी नदीकाठचे तहानलेले शेतकरी अग्रणी नदीत आंदोलन करताना दिसले होते. अग्रणी नदी खोऱ्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव, शिरढोण, मोरगाव, विठुरायाची वाडी, हिंगणगाव,अग्रण धुळगाव, लोणारवाडी असे गावे असून ह्या गावांच्या गावकुसातील अग्रणी नदी गेल्या कित्येक दिवसांपासून ठणठणीत असल्याने अग्रणी खोऱ्यातील गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता.

कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने अग्रणी नदीत पाणी सोडले. मोरगाव, हिंगणगाव, कवठेमहांकाळ, विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव, लोणारवाडी या गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत ऐन उन्हाळ्यात समाधान व्यक्त होत आहे. त्याचबरोबर बंधारे भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या म्हैसाळ योजनेचे पाणी अग्रण धुळगावमध्ये दाखल झाले आहे. आता हे पाणी लोणारवाडी बंधाऱ्यात पोहोचेल. कवठेमहांकाळ परिसरातील शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता प्रशासनाने पाटबंधारे खात्याकडे अग्रणी नदीवरील बंधारे भरून मिळावेत अशी मागणी केली होती.मागणीनुसार पाटबंधारे खात्याने सर्व्हे करून नदीकाठावरील गावांना पिण्याची व शेतीच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता बंधारे भरून घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता म्हैसाळ योजनेतून अग्रणी नदीवरील बारा बंधारे तातडीने भरण्याचे काम सुरू आहे. म्हैसाळ बंधाऱ्यात सध्या पाणी आले आहे. आता हे पाणी हिंगणगाव विठुरायाचीवाडी, धुळगाव, रांजणी, लोणारवाडी येथील अग्रणी नदीवरील बंधारे भरून घेतले जातील अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणी