शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सर्वेक्षणानंतरच सांगली, कुपवाडला वारणा धरणातून पाणी, योजनेसाठी १८५० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 11:58 IST

सर्वेक्षणासाठी स्वतंत्र कंपनीची नियुक्ती करणार

सांगली : वारणा (चांदोली) धरणातून थेट सांगलीला पाइपलाइनद्वारे पाणी आणणे किती योग्य आहे, याचे सर्वेक्षण करण्यासाठी स्वतंत्र कंपनीची नियुक्ती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, तसेच वारणा उद्भव योजना राबवायची का? या प्रश्नावर चर्चा झाली. या सर्वेक्षणानंतरच सांगली, कुपवाड शहराला थेट धरणातूनपाणी मिळणार की नाही, हे निश्चित होणार आहे.

कृष्णा नदीचे दूषित पाणी आणि वारणा धरणातून पाणी आणण्याच्या नियोजनासाठी सांगलीतील महापालिकेच्या कार्यालयात शुक्रवारी बैठक झाली. यावेळी आयुक्त सुनील पवार, उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त पंडित पाटील, जलसंपदाच्या कोल्हापूर विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक नवनाथ अवताडे, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे विशेष कार्यअधिकारी सुनील पाटील, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, जलसंपदा विभागाचे निवृत्त अधिकारी विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, जीवन प्राधिकरणचे अधिकारी एस.के. रांजणे, उपअभियंता राजाराम गळंगे यांनी चर्चेत सहभाग घेतला.थेट वारणा धरणातून पाणी उपलब्धतेचा प्रश्न उद्भवणार नाही, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वारणा नदीत मृत झालेल्या माशाप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वारणा योजना ११० किलोमीटर लांबीची असणार असून, देखभाल करणे ही बाबही अवघड असेल. सध्या माळबंगला येथील ७० एमएलडीचा जलशुद्धीकरण प्रकल्प अतिशय चांगला आहे. गेल्या दहा वर्षांत कॉलरा, काविळीची साथही आलेली नाही. वारणा उद्भव योजनेचा प्रस्ताव केला जात आहे. कृष्णा नदीचे पाणीही जास्तीत जास्त चांगले, शुद्ध, जास्त दाबाने पाणीपुरवठा करणे याबाबींवर भर देता येईल, असा सूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केला.

आयुक्त पवार म्हणाले, थेट वारणा धरणातून पाणी आणणे, वारणा उद्भव योजना राबविणे यासंदर्भात येणारा खर्च व शासनाकडून उपलब्ध होऊ शकणारा निधी याबाबत सर्वंकष अभ्यास करणे, नदीतील प्रदूषण यासंदर्भातही अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार कंपनी नियुक्त केली जाणार आहे. धरणातून पाणी आणायचे की, वारणा उद्भव योजना राबवायची; अथवा कृष्णा नदीचेच प्रदूषण कमी करणे, अत्याधुनिक यंत्रणा वापरून पाणी अधिकाधिक शुद्ध करून ते सांगली, कुपवाडला पुरवठा करणे यासंदर्भात तज्ज्ञ सल्लागार समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल.

नैसर्गिक उताराने पाणी येईलकेंगार, रांजणे यांनी शुद्ध पाण्यासाठी वारणा धरण हाच एकमेव स्रोत असल्याकडे लक्ष वेधले. महापालिकेने हाच प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी आग्रही मागणी केली. नैसर्गिक उताराने हे पाणी सांगलीपर्यंत येऊ शकते. महापालिकेच्या भविष्यातील दहा लाख लोकसंख्येसाठी दोन टीएमसी पाणी पुरेसे आहे.

योजनेसाठी १८५० कोटी

सांगली, कुपवाडसाठी थेट वारणा धरणातून पाणी आणायचे झाल्यास १२०० कोटी रुपयांचा निधी लागेल. मिरज शहराचा समावेश करायचा झाल्यास आणखी २५० कोटी रुपये लागतील. महापालिकेचा हिस्सा ४०० कोटींवर जाईल, असे आर्थिक गणित महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मांडले.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणी