शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

Sangli News: कवठेमहांकाळ तालुक्यात ‘म्हैसाळ’चे पाणी दाखल, शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 16:06 IST

म्हैसाळेचे पाणी तालुक्यात आल्याने शेतकरी पीक पद्धत बदलून फळशेती लागवडीकडे वळला

शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यात गेल्या वर्षापासून बंद असलेली म्हैसाळ  उपसा सिंचन योजना सुरू झाली असून म्हैसाळ योजनेचे पाचवा टप्प्यातून पाणी सोडले आहे. गुरुवारी जाधववाडी ते कुचीपर्यंत पाणी पोहोचल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.सध्या खरीप हंगाम जोमाने सुरू असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी द्राक्षेबाग छाटणीला सुरुवात केली आहे. उसाची नव्याने लागण करण्याची लगबग शेतकऱ्यांत सुरू आहे. म्हैसाळेचे पाणी तालुक्यात आल्याने शेतकरी पीक पद्धत बदलून फळशेती लागवडीकडे वळला आहे.म्हैसाळ योजनेचे पाणी तालुक्यात दाखल झाल्यापासून पाटालगतच्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परंतु अग्रणी नदीत पाणी सोडल्याशिवाय अग्रणी काठावरील शेतकऱ्यांना पाणीच मिळू शकत नाही. त्यामुळे अग्रणी काठावरील शेतकरी पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी अग्रणी नदीत पाणी सोडणे आवश्यक आहे.  शेतकऱ्यांनीही काळजीने पाणीपट्टी भरावी, असे आवाहन म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.अग्रणीत पाणी सोडावे!अग्रणी काठावरील शेतकऱ्यांची द्राक्षे, केळी, ऊस, हळद, मका, कांदा, लसूण, उन्हाळी भुईमूग याचबरोबर डाळींब, चिकु, पेरू, सीताफळे आदी उन्हाळ्यातील पिके जगविण्यासाठी पाण्याची गरज आहे. यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रणी नदीत पाणी सोडावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी