शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
6
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
7
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
8
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
9
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
10
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
11
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
12
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
13
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
14
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
15
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
16
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
17
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
18
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
19
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
20
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...

बंद पडलेल्या कूपनलिकेचे पाणी झेपावले आकाशात; निसर्गाच्या चमत्काराची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 20:37 IST

गेल्या दोन - अडीच वर्षापूर्वी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी काढण्यात आलेली कूपनलिका ग्रामपंचायतीने पाण्याअभावी सोडून दिली होती. परंतु, याच कूपनलिकेतून अचानक सुमारे १५० ते २०० फूट पाणी आकाशात झेपावले.

विटा: गेल्या दोन - अडीच वर्षापूर्वी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी काढण्यात आलेली कूपनलिका ग्रामपंचायतीने पाण्याअभावी सोडून दिली होती. परंतु, याच कूपनलिकेतून अचानक सुमारे १५० ते २०० फूट पाणी आकाशात झेपावले. या प्रकारामुळे ग्रामस्थही अचंबित झाले आहेत. तसेच हा सर्व प्रकार निसर्गाचा चमत्कार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सदर घटना वासुंबे (ता. खानापूर, जि. सांगली) येथे मंगळवारी घडली असून दूसऱ्या दिवशी (बुधवारी) स्थानिक ग्रामस्थांना हा प्रकार दिसून आला.

पाण्याअभावी बंद पडलेल्या कूपनलिकेतून पाण्याचे कारंजे आकाशाकडे झेपावत असल्याचे समजताच हा चमत्कार पाहण्यासाठी वासुंबे गावात लोकांची गर्दी झाली होती. खानापूर तालुक्यातील वासुंबे हे दुष्काळग्रस्त गाव आहे. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे २०१७ ला ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पिण्याच्या पाण्यासाठी शासकीय विहिरीशेजारी असलेल्या यल्लमा मंदिराजवळ कूपनलिका खुदाई केली होती. परंतु, ही कूपनलिका खुदाई करीत असताना आडवा पडदा लागल्याने हवा दुसरीकडे जाऊ लागली. त्यामुळे कूपनलिका खुदाई करणाºयाने ३०० ते ३२० फुटापर्यंतच खुदाई केली. पण त्या कूपनलिकेला पाणी लागले नाही.

तसेच कूपनलिका गेल्या दोन ते अडीच वर्षापासून बंद अवस्थेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून वासुंबे व परिसरात पाऊस सुरू आहे. पावसाचे पाणी ओढ्यातून कूपनलिकेत जात होते. मंगळवारी सकाळी अचानक मोठा आवाज झाला. त्यानंतर कूपनलिकेतून सुमारे दीडशे ते दोनशे फूट पाण्याचा कारंजा आकाशात झेपावताना लोकांच्या निदर्शनास आला. हे वृत्त वाºयासारखे गावात व परिसरात पसरताच ते पाहण्यासाठी घटनास्थळी लोकांची गर्दी झाली. बंद कूपनलिकेतून मोठ्या प्रमाणात पाणी आकाशात झेपावल्याने हा निसर्गाचा अद्भूत चमत्कार असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू झाली.

नेमके कारण अस्पष्ट...

वासुंबे येथे पाणी लागले नसल्याने सोडून दिलेल्या कूपनलिकेतून अडीच वर्षानंतर पाण्याचे मोठे कारंजे उडू लागले. हा प्रकार दिवसातून दोनवेळा होत असून त्यातील पाणी कारंजासारखे दीडशे फूट आकाशात झेपावत असल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हा प्रकार नेमका कशामुळे घडला, याचे कारण अद्याप अस्पष्टच आहे.

टॅग्स :WaterपाणीSangliसांगली