शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

सांगलीतील येळापुरात मंदिराच्या दारातच वारकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 12:10 IST

कीर्तनाचा कार्यक्रम संपला, छातीत दुखू लागल्याने मंदिराच्या बाहेर कट्ट्यावर येऊन बसला; ह्रदयविकाराच्या झटक्याने वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला

कोकरूड : येळापूर (ता. शिराळा) येथे पारायण सोहळ्यास वारकरी भजनी मंडळ घेऊन आलेल्या युवकाचा कीर्तन सोहळ्यानंतर मंदिराच्या दारातच हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ५) रात्री १२ वाजता घडली.येळापूर येथे ३१ ऑगस्टपासून श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ज्ञानेश्वरी पारायण, अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. दररोज सायंकाळी कीर्तन, भजनी मंडळाचे गायन व आरती असते. मंगळवारी सप्ताहाचा सहावा दिवस होता. मंगळवारी सायंकाळी पाटीलवाडी (ता. कऱ्हाड) येथील तानाजी चव्हाण हा युवक तेथील भजनी मंडळ घेऊन येळापूर येथे आला होता. रात्री नऊ ते अकरा असा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर भजनी मंडळाचा गायनाचा कार्यक्रम सुरू होणार होता. कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर तानाजी चव्हाण मंदिराच्या बाहेर असणाऱ्या कट्ट्यावर येऊन बसला. अचानक त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्यातच त्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. जागीच त्याचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी त्यास कोकरूड येथील रुग्णालयात नेले. वैद्यकीय सूत्रांनी तपासून मृत घोषित केले. पाटीलवाडी येथील भजनी मंडळाचा कुठेही कार्यक्रम असला की तानाजी चव्हाण हा गाडीसोबत असायचा. निर्व्यसनी, मनमिळाऊ आणि वारकरी संप्रदायाची गोडी लागलेल्या तानाजीचा भक्तीमय वातावरणात मृत्यू झाल्याने भाविकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. तानाजी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू