शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विशाल पाटील यांच्या कारवाईचा अहवाल दिल्लीला पाठविणार - नाना पटोले 

By अशोक डोंबाळे | Updated: April 25, 2024 17:24 IST

भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते महाविकास आघाडीचा प्रचार करणार

सांगली : महाविकास आघाडीच्या विरोधात काँग्रेसचे बंडखोरी करणारे विशाल पाटील यांच्या कारवाईचा अहवाल करण्यासाठीच सांगलीत आलो आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल तयार केला आहे. तो दिल्लीला पाठविणार असून, तेथून जो निर्णय होईल त्यानुसार विशाल पाटील यांच्याविरोधात काँग्रेस कारवाई करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तसेच देशात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते महाविकास आघाडीचा प्रचार करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.सांगलीतील गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. विश्वजीत कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जतचे आमदार विक्रमसिंह सावंत, काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.पटोले म्हणाले, आम्ही सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या सर्व भावना समजून घेतल्या आहेत. यासंबंधीचा सविस्तर अहवाल दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. या अहवालावर दिल्लीतून जो निर्णय होईल, त्यानुसार विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही.सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आम्हीही दिल्लीच्या काँग्रेस नेत्यांपर्यंत प्रयत्न केले. पण, देशातून भाजप हटविण्यासाठी सर्व मित्र पक्षांची महाविकास आघाडी केली आहे. त्यानुसार सांगलीची जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला गेली आहे. म्हणून महाविकास आघाडीचे उद्धवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचार करतील. काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत; मात्र, त्यांची नाराजी दूर करण्यात आम्हाला यश आले आहे.

देश कर्जबाजारी करण्याचे पाप भाजपचेदेशाला कर्जबाजारी करण्याचे पाप भाजपने केले आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी यांना त्रास देण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत देशात भाजप येता कामा नये यासाठी काम करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपकडून लोकसभा निवडणुकीत वारंवार ४०० पार जागांची घोषणा होते. या जागा त्यांना केवळ देशाचे संविधान बदलण्यासाठीच गरजेच्या आहेत, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.

संविधान वाचवणे काँग्रेसची जबाबदारीचकाँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे, आम्ही हतबल नाही आहोत, देशाचं स्वातंत्र्य आणि देशाच्या संविधान निर्मितीत काँग्रेसचे मोठे योगदान आहे. त्यामुळे ते वाचवणे हीदेखील काँग्रेसचीच जबाबदारी आहे. आम्हाला लोभापेक्षा देश महत्त्वाचा. त्यामुळे काँग्रेसचाच कार्यकर्ता निवडणुकीत पुढे असेल. एकदा जागावाटप झाल्यानंतर हे सगळे विसरावे लागते, असेही नाना पटोले म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Nana Patoleनाना पटोलेvishal patilविशाल पाटीलcongressकाँग्रेस