शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

विलासराव जगताप भाजपसाठी अदखलपात्र, आमदार विक्रमसिंह सावंतांचे टीकास्त्र

By श्रीनिवास नागे | Updated: July 17, 2023 18:14 IST

सरकार असूनही पाठपुरावा केला नाही

जत : कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेच्या पाण्यातून जत तालुक्यातील सहा ते सात तलाव भरले आहेत. त्यामुळे मी कर्नाटक सरकारकडे पाठपुरावा केला. जेथून सहज पाणी मिळू शकेल तेथे प्रयत्न सुरू आहेत. मात्र विलासराव जगताप यांनी त्यांचे सरकार असताना कुठल्याच कामासाठी पाठपुरावा केला नाही. मुळातच ते भाजपसाठी अदखलपात्र आहेत, अशी टीका आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केली.यंदा तालुक्यात दुष्काळाचे भीषण सावट आहे. शेतकऱ्यांना मदतीची खरी गरज आहे. यासाठी लाक्षणिक उपोषण व रास्ता रोको आंदोलन केले. शिवाय याचे राजकीय भांडवल करावे, अशी आमची कोणतीच मनोभावना नाही. जगताप यांनी व त्यांच्या बगलबच्च्यांनी याचेही भांडवल केले. मुळात सरकार त्यांचेच असताना त्यांनी आमच्यापेक्षा जास्त पाठपुरावा करणे गरजेचे होते. मात्र आम्ही सरकार नसताना शेतकऱ्यांना पाणी मिळावे, या एकच भावनेने कर्नाटक व महाराष्ट्र सरकारकडे सतत प्रयत्न करतो आहे. कदाचित जतला न्याय न देणाऱ्या लोकांच्या मनात हे खुपत असावे असे वाटते.सावंत म्हणाले, तालुक्यातील महावितरणची समस्या, कृषी आणि रस्ते या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक केली आहे. जलसंपदा विभागाशी संपर्क करून वारंवार म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू केले. याशिवाय विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा सुरू आहे. जनतेने ही सर्व ओळखले आहे. त्यामुळे आता तुमची नौटंकी थांबवावी.यावेळी आप्पाराया बिराजदार, सभापती सुजय शिंदे, सरदार पाटील, बाबासाहेब कोडग, अशोक बन्नेनवर, भूपेंद्र कांबळे, महादेव कोळी, बिराप्पा शिंदे, सलीम पाच्छापुरे, परशुराम मोरे, दिलीप सोलापुरे, मारुती पवार, शिवकुमार तंगडी आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस