शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

सांगलीत विद्यार्थ्यांची शाकाहारी दिंडी : शाकाहार प्रसारासाठीचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 7:46 PM

शाकाहाराचे महत्त्व सांगणारे फलक, हलगीच्या कडकडाटावर रंगलेली लेझिम पथके, झांजपथक, टाळ-मृदंगाचा निनाद अशा उत्साही वातावरणात काढण्यात आलेल्या शाकाहार दिंडीने शनिवारी सांगलीकरांचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देआज संमेलन -नियमसागर महाराज म्हणाले की, शाकाहारामुळे शरीर निरोगी राहते.

सांगली : शाकाहाराचे महत्त्व सांगणारे फलक, हलगीच्या कडकडाटावर रंगलेली लेझिम पथके, झांजपथक, टाळ-मृदंगाचा निनाद अशा उत्साही वातावरणात काढण्यात आलेल्या शाकाहार दिंडीने शनिवारी सांगलीकरांचे लक्ष वेधले. रविवारी १४ आॅक्टोबर रोजी येथील नेमिनाथनगरमध्ये होणाºया शाकाहार संमेलनानिमित्त ही दिंडी काढण्यात आली होती.ंिदंडीची सुरुवात नेमिनाथनगर येथे चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आली.

यावेळी राजमती गर्ल्स हायस्कूल अध्यक्ष महावीर शेटे, कळंत्रेआक्का प्राथमिक विद्यामंदिरचे अध्यक्ष मोहन चौगुले, राजू चौगुले, सुहास पाटील, वसंत पाटील, राजगोंडा पाटील, सुभाष देसाई, सचिन आळतेकर, सागर पाटील आदी उपस्थित होते. एक हजारहून अधिक विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले होते.

या दिंडीत महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेली पालखी अग्रभागी होती. फळे, भाजीपाला यांच्या प्रतिमांनी पालखी सजविण्यात आली होती. शहरातून ही दिंडी फिरून नेमिनाथनगर येथे आली. याठिकाणी मुनिश्री सागर महाराज, नियमसागर महाराज यांच्या उपस्थितीत नववीच्या विद्यार्थिनीने राजू कांबळे रचित शाकाहार गीत गायले. यावेळी मोहन चौगुले, महावीर शेटे, मुसा तांबोळी, मीनाक्षी वाझे, सुनील पाटील, प्रमोद खंजिरे, आनंद पाटील, राजू कांबळे, प्रसन्न शेटे, अमर पाटील, प्रा. डॉ. शोभा पाटील, अजिंक्य पाटील यांचा दिंडीच्या उत्कृष्ट संयोजनाबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना मुनिश्री सागर महाराज यांनी मार्गदर्शन केले.

ते म्हणाले की, शाकाहार हाच सर्वोत्कृष्ट आहार आहे. शाकाहारामुळे बुद्धिमत्ता वाढते, जीवन उन्नत होते. शाकाहारी जीव ओठाने, तर मांसाहारी जीव जिभेने पाणी प्राशन करतो, हे स्पष्ट केले. प्रत्येक जीवाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. मांसाहार सेवनाने अनेक विकार उत्पन्न होतात. त्यामुळे सर्वांनी शाकाहार व त्याचा प्रचार, प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

नियमसागर महाराज म्हणाले की, शाकाहारामुळे शरीर निरोगी राहते. आज बाजारात अनेक भेसळयुक्त घातक पदार्थांचा समावेश होत असून, आरोग्याच्यादृष्टीने हा प्रकार मनुष्यासाठी धोकादायक आहे. अनेक महापुरुषांनी अहिंसेचा संदेश देताना त्याप्रमाणे वर्तन ठेवले. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही शाकाहार दिंडी उपयुक्त ठरणार आहे. यावेळी सुरेश पाटील म्हणाले की, अहिंसेचे मूळ शाकाहार हेच आहे. जैन धर्म व अहिंसेचा जवळचा संबंध आहे. भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगाने शाकाहाराचे महत्त्व ओळखले आहे. आभार सुनील पाटील यांनी मानले.

देशातील पहिलेच संमेलनसंयम स्वर्ण पावन वर्षायोगनिमित्त रविवारी देशातील अशाप्रकारचे पहिलेच शाकाहार संमेलन आयोजित केले आहे. रविवारी दुपारी ३ वाजता कल्पद्रुम मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ‘शाकाहार सर्वोत्तम आहार’ या विषयावर डॉ. कल्याण गंगवाल (पुणे) यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर ‘आयुर्वेद व शाकाहार’ विषयावर डॉ. रावसाहेब पाटील (सोलापूर) व बौध्द साहित्य व शाकाहार विषयावर डॉ. संघप्रकाश दुड्डे (सोलापूर) यांचे व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, असे सुरेश पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :StrikeसंपSangliसांगली