शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'वंदे भारत'चा सांगलीला ठेंगा अन् उत्पन्नात कमी असलेल्या साताऱ्याला थांबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 13:22 IST

सांगलीतील प्रवाशांतून नाराजी : १७ डिसेंबर रोजी पंतप्रधानांकडून उद्घाटन

सांगली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र, या गाडीला पुण्याखालोखाल सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सांगली स्थानकात थांबा न देता उत्पन्नात सर्वांत कमी असलेल्या सातारा स्थानकावर थांबा दिला आहे. त्यामुळे सांगलीतील सामाजिक संघटना, प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.सध्या मुंबई ते कोल्हापूर मार्गावर सुरू असलेल्या सर्व रेल्वे गाड्यांमध्ये कोल्हापूरपाठोपाठ सांगली रेल्वे स्थानकावरून सर्वाधिक तिकिटांचे बुकिंग होत असते. कराड व किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक दुसऱ्या क्रमांकावरचे उत्पन्न देत आहे व सातारा हे सर्वांत कमी उत्पन्न देत आहे. तरीही मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगली व किर्लोस्करवाडी या दोन सर्वाधिक उत्तम उत्पन्न देणाऱ्या रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा दिला नाही.पाच हजार कोटी खर्च करून पुणे-सांगली-लोंढा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण करण्यात आले. जेणेकरून पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह सांगलीसारख्या प्रमुख महानगराला जलद रेल्वे गाड्यांचा संपर्क मिळावा. सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पुणे-लोंढा दुपदरीकरण रेल्वे प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत. तरीही याच सांगली जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय असलेल्या सांगली रेल्वे स्टेशनवरून वंदे भारत सेमी बुलेट ट्रेन सुसाट निघून जाणार आहे.

नेत्यांवर नाराजीएखाद्या प्रमुख शहराला रेल्वे गाडीचा थांबा मिळला नाही, तर संबंधित शहरातील लोकप्रतिनिधी रेल्वे मंत्रालयाकडे धाव घेतात व त्या गाडीला थांबा मिळवून देतात. मात्र, सांगलीच्या बाबतीत राजकीय उदासीनता दिसून येते, असे मत नागरिक जागृती मंचच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

सांगली जिल्ह्याचे खासदार व स्थानिक आमदारांनी हा थांबा मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व नागरिकांनी सांगली व किर्लोस्करवाडी या दोन रेल्वे स्टेशनवर वंदे भारत एक्स्प्रेसचा थांबा मिळवून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाबरोबर संघर्षाची तयारी ठेवावी. लोकप्रतिनिधींनी जर याप्रश्नी लक्ष दिले नाही, तर सांगलीकर म्हणून आम्ही येत्या लोकसभा निवडणुकीत याचा हिशेब करू. - सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस