शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

"नेहरुंनी शांतीसाठी कबुतरं सोडली होती, मोदींनी ईडी, CBI नंतर चित्ता सोडायची भीती दाखवलीय!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 12:52 IST

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांत काँग्रेस-शिवसेनेसोबत जाण्यास आम्ही तयार आहोत. त्याबाबतचा प्रस्ताव दोन्ही पक्षांना दिला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली. त्यांनी सांगली पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी शिवसेना व काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव दिला असला तरी त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. कुणी बरोबर घेतले नाही, तरी आमची आघाडी या निवडणुका स्वबळावर लढेल. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढतात तेव्हा त्याचा फायदा भाजपाला होता. दोघे वेगवेगळे लढले तर भाजपाला तोटा होत असल्याचे आतापर्यंतच्या निवडणुकीत पाहायला मिळालं असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. 

प्रकाश आंबेडकरांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला. सध्या देशाची वाटचाल राजेशाही, हुकुशाहीकडे सुरू आहे. पंडित नेहरुंनी शांततेसाठी कबुतरे सोडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चित्ते सोडले. यापूर्वी सीबीआय, ईडी, आयकर विभागाच्या माध्यमातून भीती दाखवली. आता तर चित्ते सोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. 

प्रकाश आंबेडकरांनी ईडीच्या कारवाईवरुनही निशाणा साधला आहे. कोण दोषी, कोण निर्दोष हे न्यायालयाला ठरवू द्या, असं प्रकाश आंबेडकरांनी ईडीला सुनावलं. माझं ईडीला म्हणणं आहे की, तुम्हाला कुणाला पकडायचं असेल तर पकडा. पण २ महिन्यांत त्याचा एफआयआर कोर्टात गेला पाहिजे. कोर्टाला ठरवू द्या की तुम्ही केलेला तपास खरा आहे की खोटा. पण कोणत्याही सुनावणीशिवाय किंवा गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय चार-पाच महिने एखाद्याला तुरुंगात ठेवणं, याला घटना मान्यता देत नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हणाले. 

सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनेच उचलला- 

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनेच उचलला होता. एकनाथ शिंदे हे दुसरे उद्धव ठाकरे होते. पक्षात दुफळी निर्माण होणार नाही, नैराश्य येणार नाही, ही जबाबदारी त्यांच्यावर होती. परंतू तेच पक्षाच्या नेत्याविरोधात बंड करुन सरकारमधून बाहेर पडले. मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळू नये, अशी व्युहरचना श्रीमंत मराठ्यांची आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूBJPभाजपा