शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

'उसाला ३५०० रुपये दरासाठी कारखाना अध्यक्षांना जाब विचारणार'

By अशोक डोंबाळे | Updated: May 29, 2023 18:05 IST

जादा दरासाठी १ जुलैपासून आंदोलन छेडणार

सांगली : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संपलेल्या हंगामातील उसाला प्रतिटन तीन हजार ५०० रुपये दराची मागणी साखर कारखान्याच्या अध्यक्षांकडे करायची आहे. शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना कारखानाकडे जादा दरासाठी १ जुलैपासून आंदोलन छेडणार आहे, असा इशारा शेतकरी संघटना सहकार आघाडीप्रमुख संजय कोले यांनी दिला.खा. शरद जोशी, शेती तंत्रज्ञानाचे अभ्यासक अजित नरदे यांच्या जयंतीनिमित्त सांगलीत त्यांना अभिवादन केले. यावेळी शेतकऱ्यांसमोर संजय कोले बोलत होते.संजय कोले म्हणाले, साखरेला दर चांगला मिळत असून, इथेनॉल, वीज निर्मिती प्रकल्पापासून कारखान्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. यामुळे सर्व साखर कारखानदारांना मागील गळीत हंगामातील उसाला प्रतिटन तीन हजार ५०० रुपये दर देणे सहज शक्य आहे. म्हणूनच कारखानदारांकडे हक्काच्या ऊस दरासाठी लढा उभारणार आहे. तसेच कृषी पंपाला वीज सवलत देत असल्याची शासनाची घोषणा बोगस आहे. ठरावीक युनिट, हॉर्स पॉवर, घरगुती, व्यावसायिक, लघुदाब, उच्चदाब असा वीजदरातील फरक बंद करून एकसमान दराने सर्वांना वीज देण्याची गरज आहे. असे झाले तर महावितरणचा मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस येणार आहे. अणुवीज प्रकल्प होऊ नये म्हणून कोळसा खाण सम्राट १,५०० कोटी रुपये राज्यकर्त्यांना देण्याची तयारी दर्शवतात. या पैशावरून राजकारण्यांत वाद होतात. ही गंभीर बाब असून, अणुप्रकल्प न झाल्यास कमी दरात पुरेशी वीज मिळणे शक्य होणार नाही. हे शेतकऱ्यांनी ध्यानात घ्यावे. हे प्रकल्प होण्यासाठी रेटा वाढवावा लागेल, असेही ते म्हणाले.अर्जुन नरदे, अशोक जाधव, ज्ञानदेव पाटील, बाळासो चव्हाण, संजय गायकवाड, रावसो दळवी यांनीही ऊस उत्पादकांना मार्गदर्शन केले. शीतल राजोबा यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सिद्धापा दानवाडे, शंकर कापसे, चंद्रकांत शिरोटे, अशोक पाटील, बाबा पाटणे, किसन पाटील, चारू बिरणाले, एकनाथ कापसे, सदाशिव माळी, अनिल पाटील आदी उपस्थित होते.

साखर उताऱ्यातील गोलमाल संपवाअमित राशिनकर, साखर कारखान्यांचे इथेनॉल हे मुख्य उत्पादन व साखर उपपदार्थ बनणार आहे. उसाला एकसमान दर न देता गुजरातप्रमाणे उशिरा तुटणाऱ्या उसाला जादा दर द्यायला पाहिजे. तसेच साखर कारखान्यांनी साखर उताऱ्यातील गोलमाल संपवण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेagitationआंदोलन