शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

तोडगा निघेपर्यंत कारखाने बंद  : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 16:55 IST

या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजारामबापू साखर कारखाना दराचा तोडगा निघेपर्यंत बंदच राहील, असे आश्वासन दिले. तशीच सूचना अन्य साखर कारखान्यांनाही दिली जाईल, असे सांगितले.

ठळक मुद्देइस्लामपूरला ‘स्वाभिमानी’च्या पदाधिका-यांशी बैठक

सांगली : ऊस दराबाबत तोडगा निघत नाही, तोपर्यंत साखर कारखाने बंद ठेवण्यात येतील, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, जिल्हा अध्यक्ष महेश खराडे, युवा आघाडी अध्यक्ष संजय बेले, वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव, अ‍ॅड. शमशुद्दीन संदे, उपाध्यक्ष वसंतराव सुतार, महेश जगताप, भरत चौगुले यांनी सोमवारी जयंत पाटील यांची इस्लामपूर येथे भेट घेऊन दराचा तोडगा निघेपर्यंत कारखान्यांचे गळीत हंगाम बंद ठेवण्याची मागणी केली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजारामबापू साखर कारखाना दराचा तोडगा निघेपर्यंत बंदच राहील, असे आश्वासन दिले. तशीच सूचना अन्य साखर कारखान्यांनाही दिली जाईल, असे सांगितले.

प्रा. जालिंदर पाटील म्हणाले, ऊस दराची कोंडी अद्याप फुटलेली नाही. संघटनेची ऊस परिषद दि. २३ रोजी आहे. ऊस परिषदेत दराची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी ऊस दराचा तोडगा निघत नाही, तोपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर आपण पुढाकार घेऊन सांगली जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद ठेवावेत, अशी विनंती त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली होती.

...तर तोडी बंद पाडू, वाहतूक रोखणार : खराडेऊस दराचा तोडगा निघाला नाही, तोपर्यंत कारखानदारांनी गळीत हंगाम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारखानदारांनी दराची कोंडी फोडल्याशिवाय तोडी सुरू ठेवल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्या तोडी बंद पाडण्यात येतील. तसेच ऊस वाहतूक वाहने रोखण्यात येणार आहेत. वाहनांची मोडतोड झाल्यास त्याची जबाबदारी कारखानदार व राज्य सरकारची राहील, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलSugar factoryसाखर कारखाने