शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

तोडगा निघेपर्यंत कारखाने बंद  : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 16:55 IST

या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजारामबापू साखर कारखाना दराचा तोडगा निघेपर्यंत बंदच राहील, असे आश्वासन दिले. तशीच सूचना अन्य साखर कारखान्यांनाही दिली जाईल, असे सांगितले.

ठळक मुद्देइस्लामपूरला ‘स्वाभिमानी’च्या पदाधिका-यांशी बैठक

सांगली : ऊस दराबाबत तोडगा निघत नाही, तोपर्यंत साखर कारखाने बंद ठेवण्यात येतील, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, जिल्हा अध्यक्ष महेश खराडे, युवा आघाडी अध्यक्ष संजय बेले, वाळवा तालुका अध्यक्ष भागवत जाधव, अ‍ॅड. शमशुद्दीन संदे, उपाध्यक्ष वसंतराव सुतार, महेश जगताप, भरत चौगुले यांनी सोमवारी जयंत पाटील यांची इस्लामपूर येथे भेट घेऊन दराचा तोडगा निघेपर्यंत कारखान्यांचे गळीत हंगाम बंद ठेवण्याची मागणी केली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजारामबापू साखर कारखाना दराचा तोडगा निघेपर्यंत बंदच राहील, असे आश्वासन दिले. तशीच सूचना अन्य साखर कारखान्यांनाही दिली जाईल, असे सांगितले.

प्रा. जालिंदर पाटील म्हणाले, ऊस दराची कोंडी अद्याप फुटलेली नाही. संघटनेची ऊस परिषद दि. २३ रोजी आहे. ऊस परिषदेत दराची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी ऊस दराचा तोडगा निघत नाही, तोपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर आपण पुढाकार घेऊन सांगली जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद ठेवावेत, अशी विनंती त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली होती.

...तर तोडी बंद पाडू, वाहतूक रोखणार : खराडेऊस दराचा तोडगा निघाला नाही, तोपर्यंत कारखानदारांनी गळीत हंगाम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारखानदारांनी दराची कोंडी फोडल्याशिवाय तोडी सुरू ठेवल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्या तोडी बंद पाडण्यात येतील. तसेच ऊस वाहतूक वाहने रोखण्यात येणार आहेत. वाहनांची मोडतोड झाल्यास त्याची जबाबदारी कारखानदार व राज्य सरकारची राहील, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलSugar factoryसाखर कारखाने