शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

सांगलीतील तरुणांची अनोखी स्वच्छता यात्रा : कचरामुक्तीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:45 IST

‘चला निर्धार करूया, आपली सांगली कचरामुक्त करूया’ हे ब्रीदवाक्य घेऊन कृतिशील पावलांसह डझनभर युवकांनी एकत्रित येऊन स्वच्छतेची अनोखी यात्रा सांगलीत सुरू केली.

ठळक मुद्देडझनभर युवकांचा उपनगरांमध्ये कृतिशील जागर; लोकांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली : ‘चला निर्धार करूया, आपली सांगली कचरामुक्त करूया’ हे ब्रीदवाक्य घेऊन कृतिशील पावलांसह डझनभर युवकांनी एकत्रित येऊन स्वच्छतेची अनोखी यात्रा सांगलीत सुरू केली. तब्बल महिनाभर हे तरुण हातात झाडू घेऊन अस्वच्छ उपनगरांचा कायापालट करू लागले आहेत. या मोहिमेत आस्थेचे अस्तित्व असल्याने, याचे कौतुक करीत नागरिकही यात्रेत सहभागी होऊ लागले आहेत.

स्वच्छतेच्या विषयावर काम करणारे अनेकजण असले तरी, कुणी स्वच्छता दिन साजरा करतो, तर कुणी सप्ताह साजरा करतो. त्यामुळे नागरिकांना अशा चमकोगिरीच्या मोहिमांबद्दल फारसे काही वाटत नाही. मात्र परिसराचा कायापालट कसा होऊ शकतो, हे दाखविण्याच्या आणि नागरिकांच्या मनात स्वच्छतेबद्दलची जागृती करण्याच्या उद्देशाने काही तरुण एकत्र आले. त्यांनी निर्धार संघटना स्थापन करून त्याअंतर्गत ही स्वच्छता यात्रा सुरू केली. सुरुवातीला अस्वच्छ परिसराची छायाचित्रे त्यांनी काढली आणि तेथे स्वच्छता करून, स्वच्छ झालेल्या परिसराचीही छायाचित्रे घेतली. लोकांना ती दाखविण्यास सुरुवात केल्यानंतर या मोहिमेचे कौतुक त्यांना वाटू लागले.

या तरुणांनी गेला महिनाभर अखंडित स्वच्छता यात्रा सुरू ठेवली आहे. महाराष्टÑदिनी १ मे रोजी मोहिमेला प्रारंभ केला. विश्रामबाग परिसरातील स्फूर्ती चौक, शंभरफुटी रोड, ऐंशी फुटी रोड, हसनी आश्रम रस्ता, एमएसईबी रस्ता, वालचंद महाविद्यालय परिसर, शहीद अशोक कामटे चौक, धामणी रस्ता, नेमिनाथनगर, दत्तनगर येथे मोहीम राबवून परिसराचा कायापालट करून दाखविला. गलिच्छ वाटणारे, दुर्गंधी पसरविणारे उपनगरांचे कोपरे, कचरा कोंडाळ्याचा परिसर, दुर्लक्षित सार्वजनिक जागा अशा ठिकाणी स्वच्छता केली. 

..तर शहराचे रुपडे बदलेलआता अनेक लोकही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागले आहेत. स्वच्छता यात्रेचा विस्तार लोकसहभागातून आणखी वाढविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मोजक्या तरुणांच्या गटाकडून इतका मोठा परिसर स्वच्छ होऊ शकतो, तर लाखो नागरिकांच्या सहभागाने शहराचे रूपडे बदलू शकेल, असा विचारही ते मांडत आहेत. 

या तरुणांचा सहभाग...संघटनेचे राकेश दड्डण्णावर, प्रवीण पाटील, सतीश कट्टीमणी, सूरज कोळी, मनोज नाटेकर, प्रथमेश खिलारे, आदित्य अंकलखोपे, नयन कोलप, अजेश राठोड, सागर पवार, दीपक कोळी, रोहित खराटे या तरुणांनी ही मोहीम सुरू केली आहे. जिद्द आणि चिकाटीमुळे त्यांच्या मोहिमेला आता प्रतिसाद मिळत आहे.सांगलीच्या काही तरुणांनी निर्धार संघटना स्थापन करून स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. गेला महिनाभर ती अखंडितपणे सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान