शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सांगलीतील तरुणांची अनोखी स्वच्छता यात्रा : कचरामुक्तीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:45 IST

‘चला निर्धार करूया, आपली सांगली कचरामुक्त करूया’ हे ब्रीदवाक्य घेऊन कृतिशील पावलांसह डझनभर युवकांनी एकत्रित येऊन स्वच्छतेची अनोखी यात्रा सांगलीत सुरू केली.

ठळक मुद्देडझनभर युवकांचा उपनगरांमध्ये कृतिशील जागर; लोकांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली : ‘चला निर्धार करूया, आपली सांगली कचरामुक्त करूया’ हे ब्रीदवाक्य घेऊन कृतिशील पावलांसह डझनभर युवकांनी एकत्रित येऊन स्वच्छतेची अनोखी यात्रा सांगलीत सुरू केली. तब्बल महिनाभर हे तरुण हातात झाडू घेऊन अस्वच्छ उपनगरांचा कायापालट करू लागले आहेत. या मोहिमेत आस्थेचे अस्तित्व असल्याने, याचे कौतुक करीत नागरिकही यात्रेत सहभागी होऊ लागले आहेत.

स्वच्छतेच्या विषयावर काम करणारे अनेकजण असले तरी, कुणी स्वच्छता दिन साजरा करतो, तर कुणी सप्ताह साजरा करतो. त्यामुळे नागरिकांना अशा चमकोगिरीच्या मोहिमांबद्दल फारसे काही वाटत नाही. मात्र परिसराचा कायापालट कसा होऊ शकतो, हे दाखविण्याच्या आणि नागरिकांच्या मनात स्वच्छतेबद्दलची जागृती करण्याच्या उद्देशाने काही तरुण एकत्र आले. त्यांनी निर्धार संघटना स्थापन करून त्याअंतर्गत ही स्वच्छता यात्रा सुरू केली. सुरुवातीला अस्वच्छ परिसराची छायाचित्रे त्यांनी काढली आणि तेथे स्वच्छता करून, स्वच्छ झालेल्या परिसराचीही छायाचित्रे घेतली. लोकांना ती दाखविण्यास सुरुवात केल्यानंतर या मोहिमेचे कौतुक त्यांना वाटू लागले.

या तरुणांनी गेला महिनाभर अखंडित स्वच्छता यात्रा सुरू ठेवली आहे. महाराष्टÑदिनी १ मे रोजी मोहिमेला प्रारंभ केला. विश्रामबाग परिसरातील स्फूर्ती चौक, शंभरफुटी रोड, ऐंशी फुटी रोड, हसनी आश्रम रस्ता, एमएसईबी रस्ता, वालचंद महाविद्यालय परिसर, शहीद अशोक कामटे चौक, धामणी रस्ता, नेमिनाथनगर, दत्तनगर येथे मोहीम राबवून परिसराचा कायापालट करून दाखविला. गलिच्छ वाटणारे, दुर्गंधी पसरविणारे उपनगरांचे कोपरे, कचरा कोंडाळ्याचा परिसर, दुर्लक्षित सार्वजनिक जागा अशा ठिकाणी स्वच्छता केली. 

..तर शहराचे रुपडे बदलेलआता अनेक लोकही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागले आहेत. स्वच्छता यात्रेचा विस्तार लोकसहभागातून आणखी वाढविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मोजक्या तरुणांच्या गटाकडून इतका मोठा परिसर स्वच्छ होऊ शकतो, तर लाखो नागरिकांच्या सहभागाने शहराचे रूपडे बदलू शकेल, असा विचारही ते मांडत आहेत. 

या तरुणांचा सहभाग...संघटनेचे राकेश दड्डण्णावर, प्रवीण पाटील, सतीश कट्टीमणी, सूरज कोळी, मनोज नाटेकर, प्रथमेश खिलारे, आदित्य अंकलखोपे, नयन कोलप, अजेश राठोड, सागर पवार, दीपक कोळी, रोहित खराटे या तरुणांनी ही मोहीम सुरू केली आहे. जिद्द आणि चिकाटीमुळे त्यांच्या मोहिमेला आता प्रतिसाद मिळत आहे.सांगलीच्या काही तरुणांनी निर्धार संघटना स्थापन करून स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. गेला महिनाभर ती अखंडितपणे सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान