शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सांगलीतील तरुणांची अनोखी स्वच्छता यात्रा : कचरामुक्तीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:45 IST

‘चला निर्धार करूया, आपली सांगली कचरामुक्त करूया’ हे ब्रीदवाक्य घेऊन कृतिशील पावलांसह डझनभर युवकांनी एकत्रित येऊन स्वच्छतेची अनोखी यात्रा सांगलीत सुरू केली.

ठळक मुद्देडझनभर युवकांचा उपनगरांमध्ये कृतिशील जागर; लोकांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली : ‘चला निर्धार करूया, आपली सांगली कचरामुक्त करूया’ हे ब्रीदवाक्य घेऊन कृतिशील पावलांसह डझनभर युवकांनी एकत्रित येऊन स्वच्छतेची अनोखी यात्रा सांगलीत सुरू केली. तब्बल महिनाभर हे तरुण हातात झाडू घेऊन अस्वच्छ उपनगरांचा कायापालट करू लागले आहेत. या मोहिमेत आस्थेचे अस्तित्व असल्याने, याचे कौतुक करीत नागरिकही यात्रेत सहभागी होऊ लागले आहेत.

स्वच्छतेच्या विषयावर काम करणारे अनेकजण असले तरी, कुणी स्वच्छता दिन साजरा करतो, तर कुणी सप्ताह साजरा करतो. त्यामुळे नागरिकांना अशा चमकोगिरीच्या मोहिमांबद्दल फारसे काही वाटत नाही. मात्र परिसराचा कायापालट कसा होऊ शकतो, हे दाखविण्याच्या आणि नागरिकांच्या मनात स्वच्छतेबद्दलची जागृती करण्याच्या उद्देशाने काही तरुण एकत्र आले. त्यांनी निर्धार संघटना स्थापन करून त्याअंतर्गत ही स्वच्छता यात्रा सुरू केली. सुरुवातीला अस्वच्छ परिसराची छायाचित्रे त्यांनी काढली आणि तेथे स्वच्छता करून, स्वच्छ झालेल्या परिसराचीही छायाचित्रे घेतली. लोकांना ती दाखविण्यास सुरुवात केल्यानंतर या मोहिमेचे कौतुक त्यांना वाटू लागले.

या तरुणांनी गेला महिनाभर अखंडित स्वच्छता यात्रा सुरू ठेवली आहे. महाराष्टÑदिनी १ मे रोजी मोहिमेला प्रारंभ केला. विश्रामबाग परिसरातील स्फूर्ती चौक, शंभरफुटी रोड, ऐंशी फुटी रोड, हसनी आश्रम रस्ता, एमएसईबी रस्ता, वालचंद महाविद्यालय परिसर, शहीद अशोक कामटे चौक, धामणी रस्ता, नेमिनाथनगर, दत्तनगर येथे मोहीम राबवून परिसराचा कायापालट करून दाखविला. गलिच्छ वाटणारे, दुर्गंधी पसरविणारे उपनगरांचे कोपरे, कचरा कोंडाळ्याचा परिसर, दुर्लक्षित सार्वजनिक जागा अशा ठिकाणी स्वच्छता केली. 

..तर शहराचे रुपडे बदलेलआता अनेक लोकही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागले आहेत. स्वच्छता यात्रेचा विस्तार लोकसहभागातून आणखी वाढविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मोजक्या तरुणांच्या गटाकडून इतका मोठा परिसर स्वच्छ होऊ शकतो, तर लाखो नागरिकांच्या सहभागाने शहराचे रूपडे बदलू शकेल, असा विचारही ते मांडत आहेत. 

या तरुणांचा सहभाग...संघटनेचे राकेश दड्डण्णावर, प्रवीण पाटील, सतीश कट्टीमणी, सूरज कोळी, मनोज नाटेकर, प्रथमेश खिलारे, आदित्य अंकलखोपे, नयन कोलप, अजेश राठोड, सागर पवार, दीपक कोळी, रोहित खराटे या तरुणांनी ही मोहीम सुरू केली आहे. जिद्द आणि चिकाटीमुळे त्यांच्या मोहिमेला आता प्रतिसाद मिळत आहे.सांगलीच्या काही तरुणांनी निर्धार संघटना स्थापन करून स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. गेला महिनाभर ती अखंडितपणे सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान