शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची महायुतीवर नाराजी; शरद पवारांचे केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 17:05 IST

माझ्या पक्षाची ताकद नरेंद्र मोदी यांनाच कळली

सांगली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा रविवारी सांगली दौरा होता. सांगलीत पत्रकार परिषदेत आठवले यांनी महायुतीवर थेट नाराजी व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे मात्र भरभरून कौतुक केले. आठवले म्हणाले, माझ्या पक्षाचा एकही आमदार, खासदार नाही. तरीही माझ्या पक्षाची जी काही छोटी-मोठी ताकद आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहीत आहे. त्यामुळेच मला तीन वेळा मंत्रिमंडळात घेतले, असेही ते म्हणाले.रामदास आठवले म्हणाले, आमच्या पक्षातील बाकीच्या लोकांना काही मिळत नाही. दिल्लीत आणि महाराष्ट्रातही पद मिळत नाही. राज्यात एक मंत्रिपद अथवा महामंडळ मिळायला हवे होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेसाठी एकही जागा दिली नाही. आमच्यावर अन्याय होतोय ही खरी गोष्ट आहे. सत्तेचा वाटा आम्हाला मिळायला हवा होता. शरद पवार यांच्या काळात काँग्रेस आघाडीबरोबर असताना सहा ते सातजण विधानपरिषदेवर संधी मिळाली होती. मंत्रीदेखील झाले. आघाडीच्या काळात आम्हाला अनेक ठिकाणी सत्ता मिळाली. पण, महायुतीच्या काळात आरपीआयला सत्तेत संधी मिळत नाही. याबद्दल माझे कार्यकर्ते खूपच नाराज आहेत.आंबेडकरांनी ‘रिपब्लिकन’चे नेतृत्व करावेरामदास आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष सुरू झाला. रिपब्लिकन पक्षामध्ये विविध गट आहेत. या सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्व गटांनी एकत्र यावे आणि त्याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी करावे. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. यासाठी मंत्रिपद सोडावे लागले तरी चालेल, कारण समाजापेक्षा पद मोठे नाही. शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सर्व एकत्र येतील अशी शक्यता काही वाटत नाही. रिपब्लिकनचे गट एकत्र येऊ शकतात मी त्यासाठी प्रयत्नशील आहे.

टॅग्स :SangliसांगलीRamdas Athawaleरामदास आठवलेSharad Pawarशरद पवारMahayutiमहायुती