शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

महापुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्यास उद्धव ठाकरेंकडून खीळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप 

By अशोक डोंबाळे | Updated: May 23, 2025 18:53 IST

७२ तासांचा मुख्यमंत्री असताना मंजुरी

अशोक डोंबाळेसांगली : मी राज्याचा ७२ तासांचा मुख्यमंत्री असताना महापुराचे पाणी दुष्काळी तालुक्यांसह मराठवाड्याला देण्याच्या फाईलवर सही केली होती. त्यानंतर सत्तेवर आलेले तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कामाला खीळ घातली होती, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. येत्या १५ दिवसात या कामाची निविदा निघेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.सांगलीत भाजपच्या मेळाव्यात त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत मते मांडली. ते म्हणाले, कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात १५० टीएमसी अतिरिक्त पाणी दुष्काळी मराठवाड्याकडे वळवणे, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अर्थसाह्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही भागांना मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पाला मी मंजुरी दिली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होताच या कामाला खीळ घातली होती. महायुती पुन्हा सत्तेवर येताच महापुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्याच्या प्रकल्पाला लगेच गती दिली. पाऊस येणार, तो आपण थांबवू शकणार नाही. पण, पुराचे जवळपास १५० टीएमसी पाणी वाहून समुद्रात जात आहे. या पाण्यावर कर्नाटक, महाराष्ट्राचा कुणाचाच हक्क नाही. यामुळेच पुराचे पाणी साठवण्याच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या कामाला गती देणार आहे. येत्या १५ दिवसात या कामाचे भूमिपूजन होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

असा आहे जागतिक बँकेचा प्रकल्पजागतिक बँकेच्या पथकाने १२ सप्टेंबर २०१९ रोजी पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रकल्प करण्याचे निश्चित झाले होते. या प्रकल्पात जागतिक बँक सुमारे २३२८ कोटी रुपये, तर राज्य सरकार सुमारे ९९८ कोटी रुपये उपलब्ध करुन देणार आहे. एकूण ३ हजार ३२४ कोटी ६३ लाख रुपयांचा हा प्रकल्प आहे.

टॅग्स :SangliसांगलीChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसfloodपूरUddhav Thackerayउद्धव ठाकरे