शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

अतिघाई ठरतेय जीवघेणी ; अडीच कोटीचा दंड, तरीही बेशिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:25 IST

वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरूच ठेवली असून, या वर्षभरात वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून २ कोटी ६१ लाखांचा दंड वसूल करूनही, वाहतूक नियमांना कोलदांडा कायम आहे.

ठळक मुद्देवर्षभरातील कारवाई : नियम मोडल्याने वाढली जिल्ह्यातील अपघातांची शक्यता

शरद जाधव ।सांगली : रस्त्याचा अंदाज न घेता भरधाव वेगाने ओव्हरटेक करणे, तसेच शहरातील प्रमुख मार्गावर सिग्नल असतानाही त्याचे पालन न करता सिग्नल तोडण्याची वाहनधारकांची मानसिकताच जीवघेणी ठरत आहे. वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरूच ठेवली असून, या वर्षभरात वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून २ कोटी ६१ लाखांचा दंड वसूल करूनही, वाहतूक नियमांना कोलदांडा कायम आहे.

जिल्ह्यातून तीन राष्टÑीय महामार्ग, दोन आंतरराज्य मार्ग, तर ११ राज्यमार्ग जातात. यातील रस्त्यांची स्थितीही यथातथाच आहे. त्यात बहुतांश मार्गांचे काम सुरू असल्याने वाहनधारकांना सावकाशपणे वाहन चालवावे लागते. या मार्गावर अती वेगाने वाहन चालविणाºयावर कारवाई होण्याबरोबरच सेवा मार्गाचा वापर टाळणे, वेगमर्यादा न सांभाळणे यासह इतर कारणांनी अपघाताची शक्यता वाढत असते. पण याच्या उलट परिस्थिती शहरात आहे. शहरातील प्रमुख रस्ते चकाचक झाल्याने सर्रास वाहतूक नियम मोडले जातात. विशेषत: सिग्नल तोडण्यात वाहनचालक अग्रभागी आहेत. तरुणांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन होण्याबरोबरच धोकादायकरितीने ओव्हरटेक केले जात असल्यानेही अपघात होत आहेत.

यावर पर्याय म्हणून पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी सांगली व मिरज शहरात काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्यात शहरातील प्रमुख चौकांमध्ये प्लास्टिकचे दुभाजक बसविण्यात आले आहेत, तर देशातील प्रमुख शहरात असलेली ‘लेफ्ट साईड फ्री’ संकल्पनाही राबविण्यात आली आहे. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण शहरात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. नव्यानेच बसविलेल्या सीसीटीव्हीमुळे थेट नियम मोडणाºया वाहनचालकाचा वाहन क्रमांक मिळत असल्याने, कारवाई सोपी होत आहे. असे असले तरी नियमांचे उल्लंघन सुरूच आहे. शहरात सिग्नलचे सेकंद पूर्ण होण्याअगोदरच भरधावपणे वाहन पुढे रेटल्यानेही अपघात होत आहेत.‘स्पीड गन’ने टिपली : २९८५ भरधाव वाहनेअपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी व शहरातील वाहतूक नियोजनासाठी सांगलीतील वाहतूक शाखेकडे ‘इंटरसेप्टर’ वाहने दाखल झाली आहेत. या वाहनांत वेगमर्यादेचे पालन न करणाºया वाहनांवर ‘स्पीड गन’च्या माध्यमातून कारवाई केली जाते. केवळ तीन महिन्यात सांगली व मिरज शहरात भरधाव वाहने चालविणाºया २९८५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तरीही सांगली - मिरज रोड, सांगली-कोल्हापूर रोड, मिरज-पंढरपूर रोडवर सुसाट वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. 

अपघातामध्ये तरुण मुलांची संख्या अधिक असते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना वाहन हातात देताना अगोदरच संभाव्य परिणाम सांगावेत. तरुण मुलांमध्ये वेगाने वाहन चालविण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पालकांनी आवर्जून आपल्या मुलांवर लक्ष ठेवल्यास त्यांची ही सवय जाऊ शकते. महाविद्यालयीन स्तरावर मुलांना योग्य मार्गदर्शन मिळावे.- पूनम गायकवाड, समुपदेशकमहाविद्यालयीन स्तरावर एनएसएसच्या माध्यमातून मुलांना वाहतूकविषयक नियमांची माहिती दिली जाते. शिवाय तज्ज्ञांचे मार्गदर्शन घडवून, अपघात, त्याचे परिणाम याबाबतही सजग केले जाते. तरीही वाहतूक नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांनी आपली जबाबदारी समजून वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टळण्यास मदत होणार आहे.- दिलीप कोथळे, प्राध्यापक

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी